शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वित्त विभागास १५ मार्चनंतर कुलूप!

By admin | Updated: January 7, 2016 02:42 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने

अतुल कुलकर्णी,  मुंबईमार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने, पद्धतीने खरेदी करायची, अशा गोष्टींना या वर्षी चाप लावण्यात आला असून, निधी वितरण, पुनर्विनियोजन संबंधीचे कोणतेही प्रस्ताव १५ मार्चनंतर वित्त विभागात स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.अर्थसंकल्पाएवढ्या ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची वेळ पहिल्याच वर्षी भाजपा-शिवसेना सरकारवर आली. या आधी आघाडी सरकारने दहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या, तेव्हा विरोधात असणाऱ्या भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नियोजनच करता येत नाही, असे म्हणत, टीका केली होती. मात्र, त्यांनाच ३१ हजार कोटींच्या मागण्या मंजूर करण्याची वेळ आल्यानंतर, खडबडून जाग्या झालेल्या युती सरकारने कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे आता वितरित करण्यात आलेला निधी ज्यांना खर्च करायचा असेल, त्यांनी १५ मार्चच्या आत आपले प्रस्ताव वित्त विभागात द्यावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत आपण १५ मार्चनंतर येणाऱ्या एकाही फाइलवर सही करणार नाही, असे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी हे करावेच लागेल असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीची विहित कालमर्यादा ठरवून दिली आहे. याची माहिती संबंधितांनाही देण्यात आली आहे. आपण व्यक्तीश: सगळ्या मंत्री, राज्यमंत्री, सचिवांना पत्र पाठवले आहे. प्रस्ताव वेळेत पाठवणे शक्य झाले नाही, तर ती सगळी जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.मंत्रिमंडळाची, प्रशासकीय, सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता, सचिव समितीची, योजनांतर्गत निधी असल्यास नियोजन विभागाची मान्यताही अनेकदा घेतली जात नाही, नवीन लेखाशीर्ष असल्यास, त्या संबंधीच्या कार्यवाहीची पूर्तता न करताच, शेवटच्या क्षणी अशा फाइली वित्त विभागात येतात. त्यावेळी उपलब्ध असणारा वेळ आणि प्रस्तावांची प्रचंड संख्या पहाता, असे प्रस्ताव तपासणे अशक्य होते. आता वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाणार आहे.