शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

वित्त विभागास १५ मार्चनंतर कुलूप!

By admin | Updated: January 7, 2016 02:42 IST

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने

अतुल कुलकर्णी,  मुंबईमार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खर्चाची बिले सादर करायची, खर्च न करताच ती मंजूर करायची, ३१ मार्चनंतर निधी परत जाऊ नये, म्हणून शेवटच्या आठवड्यात वाट्टेल त्या दराने, पद्धतीने खरेदी करायची, अशा गोष्टींना या वर्षी चाप लावण्यात आला असून, निधी वितरण, पुनर्विनियोजन संबंधीचे कोणतेही प्रस्ताव १५ मार्चनंतर वित्त विभागात स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.अर्थसंकल्पाएवढ्या ३१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याची वेळ पहिल्याच वर्षी भाजपा-शिवसेना सरकारवर आली. या आधी आघाडी सरकारने दहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या होत्या, तेव्हा विरोधात असणाऱ्या भाजपाने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना नियोजनच करता येत नाही, असे म्हणत, टीका केली होती. मात्र, त्यांनाच ३१ हजार कोटींच्या मागण्या मंजूर करण्याची वेळ आल्यानंतर, खडबडून जाग्या झालेल्या युती सरकारने कठोर पावले उचलली आहेत.त्यामुळे आता वितरित करण्यात आलेला निधी ज्यांना खर्च करायचा असेल, त्यांनी १५ मार्चच्या आत आपले प्रस्ताव वित्त विभागात द्यावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत आपण १५ मार्चनंतर येणाऱ्या एकाही फाइलवर सही करणार नाही, असे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी हे करावेच लागेल असे ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीची विहित कालमर्यादा ठरवून दिली आहे. याची माहिती संबंधितांनाही देण्यात आली आहे. आपण व्यक्तीश: सगळ्या मंत्री, राज्यमंत्री, सचिवांना पत्र पाठवले आहे. प्रस्ताव वेळेत पाठवणे शक्य झाले नाही, तर ती सगळी जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असेल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.मंत्रिमंडळाची, प्रशासकीय, सुधारित प्रशासकीय मान्यता न घेता, सचिव समितीची, योजनांतर्गत निधी असल्यास नियोजन विभागाची मान्यताही अनेकदा घेतली जात नाही, नवीन लेखाशीर्ष असल्यास, त्या संबंधीच्या कार्यवाहीची पूर्तता न करताच, शेवटच्या क्षणी अशा फाइली वित्त विभागात येतात. त्यावेळी उपलब्ध असणारा वेळ आणि प्रस्तावांची प्रचंड संख्या पहाता, असे प्रस्ताव तपासणे अशक्य होते. आता वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाणार आहे.