शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला

By admin | Updated: August 2, 2016 05:31 IST

कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरला

डोंबिवली : कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरल्याने सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेमार्गावरील लोकलसेवा कोलमडली. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून मुंबईकडे होणारी धिम्या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.रविवारी मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पारसिक बोगद्यापाशी रुळांवर माती जमा झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलमडली होती. सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे रेल्वे सेवा बाधित असण्याच्या शक्यतेने प्रवाशांनी वेळेअगोदरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, लोकल अवघ्या १० मिनिटे लेट असल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कल्याण स्थानकातून सीएसटीकडे जाण्याकरिता ही लोकल निघाली, त्याच वेळी डबा रुळांवरून घसरताच गाडीतील काही प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या टाकल्या. गाडीने वेग घेतला नसल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले नाही. लोकल घसरल्यानंतर घटनास्थळी रोड अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनचे (एआरटी) पथक पोहोचले. त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील फलाट क्र. १ आणि १ एची वाहतूक बंद करण्यात आल्याने ठाकुर्ली स्थानकातून कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या फलाट क्र.४/५ वर वळविण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे उपनगरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती पथकाला घसरलेला डबा तेथून हलविण्यात अनंत अडथळे आले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पाऊण तास ते एक तास विलंबाने सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. (प्रतिनिधी) >दुपारी १२.२० च्या सुमारास घसरलेला लोकलचा डबा पुन्हा रूळांवर घेण्यात यश आले. त्यानंतर, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सीएसटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर, तासाभराने दुपारी २.१२ च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची चौकशी सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.सोमवारी सकाळीच ७.२० च्या सुमारास खर्डी स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाला होता. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनही त्यामुळे उशीरा धावल्या. परिणामी, या मार्गावरील हजारो प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले.