शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला

By admin | Updated: August 2, 2016 05:31 IST

कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरला

डोंबिवली : कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरल्याने सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेमार्गावरील लोकलसेवा कोलमडली. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून मुंबईकडे होणारी धिम्या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.रविवारी मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पारसिक बोगद्यापाशी रुळांवर माती जमा झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलमडली होती. सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे रेल्वे सेवा बाधित असण्याच्या शक्यतेने प्रवाशांनी वेळेअगोदरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, लोकल अवघ्या १० मिनिटे लेट असल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कल्याण स्थानकातून सीएसटीकडे जाण्याकरिता ही लोकल निघाली, त्याच वेळी डबा रुळांवरून घसरताच गाडीतील काही प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या टाकल्या. गाडीने वेग घेतला नसल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले नाही. लोकल घसरल्यानंतर घटनास्थळी रोड अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनचे (एआरटी) पथक पोहोचले. त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील फलाट क्र. १ आणि १ एची वाहतूक बंद करण्यात आल्याने ठाकुर्ली स्थानकातून कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या फलाट क्र.४/५ वर वळविण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे उपनगरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती पथकाला घसरलेला डबा तेथून हलविण्यात अनंत अडथळे आले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पाऊण तास ते एक तास विलंबाने सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. (प्रतिनिधी) >दुपारी १२.२० च्या सुमारास घसरलेला लोकलचा डबा पुन्हा रूळांवर घेण्यात यश आले. त्यानंतर, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सीएसटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर, तासाभराने दुपारी २.१२ च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची चौकशी सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.सोमवारी सकाळीच ७.२० च्या सुमारास खर्डी स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाला होता. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनही त्यामुळे उशीरा धावल्या. परिणामी, या मार्गावरील हजारो प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले.