शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला

By admin | Updated: August 2, 2016 05:31 IST

कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरला

डोंबिवली : कल्याणहून मुंबईकडे जाणारी लोकल कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ‘१-ए’मधून बाहेर पडत असतानाच लोकलचा एक डबा रुळांवरून घसरल्याने सोमवारी सकाळीच मध्य रेल्वेमार्गावरील लोकलसेवा कोलमडली. सकाळी ९ वाजून ५२ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कल्याणहून मुंबईकडे होणारी धिम्या मार्गावरील वाहतूक तीन तास बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.रविवारी मुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे स्थानकात व कळवा येथे रुळांवर पाणी साचल्याने तसेच पारसिक बोगद्यापाशी रुळांवर माती जमा झाल्याने उपनगरीय रेल्वे वाहतूक कोलमडली होती. सोमवारी पहाटे पावसाची संततधार सुरूच होती, त्यामुळे रेल्वे सेवा बाधित असण्याच्या शक्यतेने प्रवाशांनी वेळेअगोदरच रेल्वे स्थानक गाठले. मात्र, लोकल अवघ्या १० मिनिटे लेट असल्याने त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कल्याण स्थानकातून सीएसटीकडे जाण्याकरिता ही लोकल निघाली, त्याच वेळी डबा रुळांवरून घसरताच गाडीतील काही प्रवाशांनी तत्काळ बाहेर उड्या टाकल्या. गाडीने वेग घेतला नसल्याने दुर्घटनेचे गांभीर्य वाढले नाही. लोकल घसरल्यानंतर घटनास्थळी रोड अ‍ॅक्सिडेंट रिलीफ ट्रेनचे (एआरटी) पथक पोहोचले. त्यांनी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. कल्याणमधील फलाट क्र. १ आणि १ एची वाहतूक बंद करण्यात आल्याने ठाकुर्ली स्थानकातून कल्याणकडे येणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या फलाट क्र.४/५ वर वळविण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळी धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जलद मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीमुळे उपनगरी प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पावसाची संततधार सुरू असल्याने दुरुस्ती पथकाला घसरलेला डबा तेथून हलविण्यात अनंत अडथळे आले. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक पाऊण तास ते एक तास विलंबाने सुरू होती. दुपारी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. (प्रतिनिधी) >दुपारी १२.२० च्या सुमारास घसरलेला लोकलचा डबा पुन्हा रूळांवर घेण्यात यश आले. त्यानंतर, दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सीएसटीकडे जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर, तासाभराने दुपारी २.१२ च्या सुमारास कल्याण स्थानकाच्या दिशेने येणारी धीम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबतची चौकशी सुरू असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.सोमवारी सकाळीच ७.२० च्या सुमारास खर्डी स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाला होता. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सीएसटीकडे येणाऱ्या गाड्यांना फटका बसला. राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनही त्यामुळे उशीरा धावल्या. परिणामी, या मार्गावरील हजारो प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले.