शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

मुंबई खोळंबली, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प

By admin | Updated: June 19, 2015 13:29 IST

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. 

मुंबई व परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साठले आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, शीव येथे रुळांवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली. तर हार्बर व पश्चिम रेल्वे येथील वाहतूकही पाणी साचल्याने ठप्प पडली. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांना याचा फटका बसला असून काही एक्सप्रेस गाड्यांचे एसीही बंद पडल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. कर्जत, कसारा व कल्याण ते ठाण्यापर्यंतची धीम्या मार्गावरील  वाहतूक संथगतीने सुरु आहे. ठाणे ते सीएसटी पर्यंतची वाहतूक ठप्प पडली आहे. तर हार्बर मार्गावर वाशी - मुंबई सीएसटी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट - माहीम दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे.  मुंबई मंहापालिकेने शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अत्यावश्यक कामं असतिल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी अधिका-यांनी दिला आहे. पावसाने जनजीवन विस्कळित झाल्यामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच न्यायालयाचे कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला. राजकीय कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव व कौल्हापूरला जाणार होते. मात्र, आपत्कालिन स्थिती बघता त्यांनी दौरा रद्द केला आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये फडणवीसांनी हजेरी लावली आणि परिस्थितीची माहिती घेतली. दुपारी २.३० वाजता संपू्र्ण भरतीची वेळ असल्याने त्याआधी मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

आपत्तीमध्ये भर पडू नये म्हणून मुंबईतील अनेक सखल भागामधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरळित करण्यात येणार आहे.