शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

मुंबई खोळंबली, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा ठप्प

By admin | Updated: June 19, 2015 13:29 IST

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक ठप्प पडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. 

मुंबई व परिसरात रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साठले आहे. मध्य रेल्वेवर कुर्ला, शीव येथे रुळांवर पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प पडली. तर हार्बर व पश्चिम रेल्वे येथील वाहतूकही पाणी साचल्याने ठप्प पडली. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांना याचा फटका बसला असून काही एक्सप्रेस गाड्यांचे एसीही बंद पडल्याने प्रवाशांच्या हालात भर पडली आहे. कर्जत, कसारा व कल्याण ते ठाण्यापर्यंतची धीम्या मार्गावरील  वाहतूक संथगतीने सुरु आहे. ठाणे ते सीएसटी पर्यंतची वाहतूक ठप्प पडली आहे. तर हार्बर मार्गावर वाशी - मुंबई सीएसटी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट - माहीम दरम्यानची वाहतूक बंद पडली आहे.  मुंबई मंहापालिकेने शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

येत्या २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अत्यावश्यक कामं असतिल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी अधिका-यांनी दिला आहे. पावसाने जनजीवन विस्कळित झाल्यामुळे शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच न्यायालयाचे कामकाजही बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घेतला. राजकीय कार्यक्रमही आज रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव व कौल्हापूरला जाणार होते. मात्र, आपत्कालिन स्थिती बघता त्यांनी दौरा रद्द केला आणि मुंबईत थांबण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये फडणवीसांनी हजेरी लावली आणि परिस्थितीची माहिती घेतली. दुपारी २.३० वाजता संपू्र्ण भरतीची वेळ असल्याने त्याआधी मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

आपत्तीमध्ये भर पडू नये म्हणून मुंबईतील अनेक सखल भागामधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला असून परिस्थिती पूर्वपदावर येताच वीजपुरवठा सुरळित करण्यात येणार आहे.