शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
2
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
3
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
4
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
5
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
6
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
7
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
8
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
9
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
10
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
11
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
12
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
13
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
14
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
15
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
16
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
17
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
18
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
19
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
20
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 05:44 IST

निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही केली आगपाखड, पोरखेळ चालल्याची टीका

छत्रपती संभाजीनगर/मुंबई : मतदान अगदी एक दिवसावर आले असताना काही नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेणारा राज्य निवडणूक आयोग टीकेचा धनी ठरला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही आयोगावर आगपाखड केली आहे. 'निवडणुका रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? ते कुणाचा सल्ला घेत आहेत, याची मला कल्पना नाही', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगावर प्रहार केला. या संदर्भात लवकरच आयोगाला निवेदन देणार असल्याचे त्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्य निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. जेवढा माझा अभ्यास आहे, वकिलांसोबत बोललो, त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाहीत. निलंग्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले तो न्यायालयात गेला. मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी आयोगाला प्रतिवादी केले म्हणून संपूर्ण निवडणूकच पुढे ढकलणे चुकीचे आहे.'

निवडणूक लढण्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली त्यांचे कष्ट वाया गेले. विविध जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाला आपले मत कळवले; मात्र त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आयोग स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाला पडला संकेतांचा विसर

मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार हा गोंधळ असतानाच मतदानाच्या काही तास आधी काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करून राज्य निवडणूक आयोगाने गोंधळात आणखी भर घालून 'गोंधळात गोंधळ' अशी स्थिती करून ठेवल्याची टीका मतदारांमधून केली जात आहे.

देशभरात लोकसभा व राज्यात विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही गोंधळाशिवाय पार पाडत असताना राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घातलेल्या या घोळावर सर्वपक्षीय नेते, उमेदवार आणि सामान्य मतदारही नाराजी व्यक्त करत आहेत.

आयोग म्हणतो, कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय

कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. १७ (१ब) नुसार उमेदवाराने अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असता, असे राज्य निवइणक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक थांबवणे ही दुर्दैवी बाब

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाहीत. पण, यावेळेस निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. यावर मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन. पण, अशा पद्धतीने निवडणुका थांबवणे, ही दुर्दैवी बाब आहे. -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

राज्य सरकार जबाबदार

तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली? आता ऐनवेळी काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. हा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार आहे. याबाबत काही लोक उच्च न्यायालयात जाणार आहेत. -पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री

इतका गोंधळलेला आयोग पाहिला नाही

इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिला नाही. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा व सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असत. मात्र, आता आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे. एका दिवसावर मतदान येऊन ठेपलेले असताना काही निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने जनतेत संभ्रम आहे. आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम संशयास्पद आहे. - बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ काँग्रेस नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission faces all-party anger over cancelled local body polls.

Web Summary : The Election Commission's decision to postpone local body elections sparked outrage. Leaders across parties criticized the move, citing legal misinterpretations and questioning the commission's autonomy. Concerns were raised about wasted efforts and public confusion.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी