शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Elections 2025: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 05:44 IST

निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? मुख्यमंत्री फडणवीस यांचा सवाल; सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही केली आगपाखड, पोरखेळ चालल्याची टीका

छत्रपती संभाजीनगर/मुंबई : मतदान अगदी एक दिवसावर आले असताना काही नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेणारा राज्य निवडणूक आयोग टीकेचा धनी ठरला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही आयोगावर आगपाखड केली आहे. 'निवडणुका रद्द करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही. निवडणूक आयोग कोणता कायदा काढत आहे? ते कुणाचा सल्ला घेत आहेत, याची मला कल्पना नाही', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगावर प्रहार केला. या संदर्भात लवकरच आयोगाला निवेदन देणार असल्याचे त्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्य निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. जेवढा माझा अभ्यास आहे, वकिलांसोबत बोललो, त्या सगळ्यांच्या मतानुसार असे कुणीही न्यायालयात गेले तर निवडणुका रद्द होत नाहीत. निलंग्यात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आणि ज्याचे नामनिर्देशन रद्द झाले तो न्यायालयात गेला. मग अशावेळी ज्यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यांना प्रचाराचा वेळ मिळाला, अर्ज परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, कुणीतरी आयोगाला प्रतिवादी केले म्हणून संपूर्ण निवडणूकच पुढे ढकलणे चुकीचे आहे.'

निवडणूक लढण्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली त्यांचे कष्ट वाया गेले. विविध जिल्हाधिकाऱ्यांनीही आयोगाला आपले मत कळवले; मात्र त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. आयोग स्वायत्त असल्याने त्यांचा निर्णय मान्य करावा लागेल, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाला पडला संकेतांचा विसर

मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार हा गोंधळ असतानाच मतदानाच्या काही तास आधी काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करून राज्य निवडणूक आयोगाने गोंधळात आणखी भर घालून 'गोंधळात गोंधळ' अशी स्थिती करून ठेवल्याची टीका मतदारांमधून केली जात आहे.

देशभरात लोकसभा व राज्यात विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही गोंधळाशिवाय पार पाडत असताना राज्य निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घातलेल्या या घोळावर सर्वपक्षीय नेते, उमेदवार आणि सामान्य मतदारही नाराजी व्यक्त करत आहेत.

आयोग म्हणतो, कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय

कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. १७ (१ब) नुसार उमेदवाराने अपील केल्यास अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला असता, असे राज्य निवइणक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक थांबवणे ही दुर्दैवी बाब

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुका कधीही थांबवल्या जात नाहीत. पण, यावेळेस निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला. यावर मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन. पण, अशा पद्धतीने निवडणुका थांबवणे, ही दुर्दैवी बाब आहे. -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

राज्य सरकार जबाबदार

तयारी नव्हती तर निवडणूक घेण्याची गडबड कशासाठी केली? आता ऐनवेळी काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. हा पोरखेळ करून टाकला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. या गोंधळाला राज्य सरकार जबाबदार आहे. याबाबत काही लोक उच्च न्यायालयात जाणार आहेत. -पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री

इतका गोंधळलेला आयोग पाहिला नाही

इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिला नाही. पूर्वीचे आयोग स्वायत्त असायचे, निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा व सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असत. मात्र, आता आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे. एका दिवसावर मतदान येऊन ठेपलेले असताना काही निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने जनतेत संभ्रम आहे. आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम संशयास्पद आहे. - बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ काँग्रेस नेते

English
हिंदी सारांश
Web Title : Election Commission faces all-party anger over cancelled local body polls.

Web Summary : The Election Commission's decision to postpone local body elections sparked outrage. Leaders across parties criticized the move, citing legal misinterpretations and questioning the commission's autonomy. Concerns were raised about wasted efforts and public confusion.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी