शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:56 IST

विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाने मागील कार्यकाळात केलेली तत्वत: शेतकरी कर्जमाफी बोटावर मोजण्याइतपच शेतकऱ्यांना मिळाली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर या निवडणुकीत सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाकडे लागली आहे. मात्र ज्यांना सत्ता येण्याची शाश्वती आहे त्यांच्याकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसून विरोधकांकडून मात्र सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजप-शिवसेनेच्या मागील कार्यकाळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. कधी नव्हे तो राज्यात शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील स्थिती सत्ताधारी भाजपच्या हाताबाहेर गेली होती. तर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काही निकष लावून कर्जमाफीची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी अनेक निकष लावण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक गावातून बोटांवर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. तरी देखील भाजप आणि शिवसेनेकडून कर्जमाफी दिल्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. परंतु, काही काळातच शिवसेनेने तुरळक शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त करत स्वत:ला वेगळं करून घेतलं. तसेच भाजपला धारेवर धरण्यास सुरुवात केली. सत्तेत असूनही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे कर्जमाफी योजना शेतकऱ्यांपर्यंतच पोहचली नसल्याचे समोर आले.

आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीतही कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. तरी देखील सरसकट कर्जमाफीसंदर्भात भाजपकडून चकार शब्द काढला जात नाही. तर शिवसेनेकडून अधुनमधून कर्जमाफीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्यात येते.

हाच मुद्दा हेरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्ता आल्यास, पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरसकट कर्जमाफी करू, असं आश्वासन आघाडीकडून देण्यात आले आहे. विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.