शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीचं आघाडीचं आश्वासन, तर भाजपकडून चकार शब्द नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 12:56 IST

विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - भारतीय जनता पक्षाने मागील कार्यकाळात केलेली तत्वत: शेतकरी कर्जमाफी बोटावर मोजण्याइतपच शेतकऱ्यांना मिळाली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळून निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची नजर या निवडणुकीत सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाकडे लागली आहे. मात्र ज्यांना सत्ता येण्याची शाश्वती आहे त्यांच्याकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसून विरोधकांकडून मात्र सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजप-शिवसेनेच्या मागील कार्यकाळात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. कधी नव्हे तो राज्यात शेतकरी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी राज्यातील स्थिती सत्ताधारी भाजपच्या हाताबाहेर गेली होती. तर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम होते. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काही निकष लावून कर्जमाफीची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी अनेक निकष लावण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक गावातून बोटांवर मोजण्याइतपतच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. तरी देखील भाजप आणि शिवसेनेकडून कर्जमाफी दिल्याचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागली होती. परंतु, काही काळातच शिवसेनेने तुरळक शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफी योजनेवर नाराजी व्यक्त करत स्वत:ला वेगळं करून घेतलं. तसेच भाजपला धारेवर धरण्यास सुरुवात केली. सत्तेत असूनही शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे कर्जमाफी योजना शेतकऱ्यांपर्यंतच पोहचली नसल्याचे समोर आले.

आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीतही कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. तरी देखील सरसकट कर्जमाफीसंदर्भात भाजपकडून चकार शब्द काढला जात नाही. तर शिवसेनेकडून अधुनमधून कर्जमाफीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्यात येते.

हाच मुद्दा हेरून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरसकट कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. सत्ता आल्यास, पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरसकट कर्जमाफी करू, असं आश्वासन आघाडीकडून देण्यात आले आहे. विरोधकांकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात येत असताना भाजपकडून कर्जमाफीसंदर्भात चकार शब्द उच्चारला जात नसल्याचे सध्याचे प्रचारातील चित्र आहे.