शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

कर्जमाफीची तरतूद अधिवेशनात - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:10 IST

शेतकरी कर्जमाफीसाठीची आर्थिक तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे याच अधिवेशनात केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्र परिषदेत

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठीची आर्थिक तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे याच अधिवेशनात केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्र परिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत घोटाळा झाला होता. या घोटाळ्यावरुन कॅगने ताशेरे ओढले होते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. पण आम्ही युती सरकारने दिलेल्या कर्जमाफीत अनियमितता होऊ नये यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. जनतेच्या पैशांचा अपव्यव होऊ नये अशी आमची भूमिका आहे. २५ हजार केंद्रांच्या माध्यमातून कर्जमाफीची व्यवस्था उद्यापासून सुरू होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला.राज्यात ९८ टक्केपेरण्या पूर्णराज्यात ९८.०३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीच्या मुद्यावरुन सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन छेडण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या समितीमध्ये असे काही नेते आहेत की जे हौशे-गौशे आहेत आणि त्यांना ते शेतकरी नेते असल्याचे वाटते. आपली दुकानदारी कायम राहावी म्हणून ते काहीतरी करीत असतात. त्यांना शेतकरीच जागा दाखवतील.मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कथित घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. पुराव्यांसह आरोप सिद्ध झाल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने शिल्लक असलेल्या २३ लाख क्विंटल तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना टोकन दिले आहे. या खरेदीची चौकशी सुरु आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.