शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोडशेडिंगमुळे राज्यात कोट्यवधींचा फटका, मराठवाड्यात नऊ तास वीज गायब, उत्पादन झाले ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 05:48 IST

कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.

मुंबई : कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती संच बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. रविवारपासून ५ ते ९ तासांपर्यंत भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे. परिणामी उद्योग बंद ठेवायची पाळी उद्योजकांवर आली असून, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतीपंपही बंद झाले आहेत.मराठवाड्यात तब्बल नऊ तास वीज गायब झाल्याने औरंगाबादमधील प्रमुख एमआयडीसींसह सर्वच उद्योगांमधील उत्पादन बंद झाले आहे. राज्याला सध्या १५ हजार मेगावॅट विजेची गरज आहे. पण १४ हजार १०० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून ९०० मेगावॅटचा तुटवडा असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मात्र वस्तुस्थिती वेगळी असून दीड हजार मेगावॅटहून अधिक तुटवडा भासत आहे.सोमवारपासून मराठवाड्यातील वीजनिर्मिती कंपन्यांकडून महावितरणला विजेचा पुरवठा कमी झाल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. विदर्भात नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अमरावती व अकोला जिल्ह्यांमध्ये मोठे लोडशेडिंग सुरू आहे.पुणे जिल्हा व उद्योगनगरी पिंपरी चिंचवडलाही फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४० टक्के भागात भारनियमन सुरू आहे. सांगली जिल्ह्यात सरासरी दोन तास, सातारा जिल्ह्यात वसुली रखडलेल्या गावांना व सिंधुदुर्गलाही भारनियमनाचे चटके बसले आहेत. नाशिक व खान्देशातही अशीच स्थिती आहे.शेतीचे पाणीही झाले बंदजून, जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर आॅगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. जलाशये भरली, मात्र आता विजेअभावी शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर ‘हीट’सप्टेंबरच्या दुस-या आठवड्यातच आॅक्टोबर हीट जाणवत आहे. विजेअभावी मात्र हा उकाडा असह्य झाला आहे. ग्रामीण भागांत नऊ तर शहरी भागांत सहा तासांपर्यंत भारनियमन सुरू आहे.कोयनेतून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मितीकोयना धरणाच्या टप्पा एक, दोन, तीन, चारमधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी दिली.15328 मेगावॅट विजेची गरज14812 मेगावॅट वीज उपलब्ध516 मेगावॅट विजेची तूटअसे आहे लोडशेडिंगविभाग तासमराठवाडा : ९विदर्भ : ४ ते ८प. महाराष्ट्र : ३ ते ५उत्तर महाराष्ट्र : ३ ते ५कोकण : ४ ते ५ 

 

टॅग्स :Governmentसरकार