शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचेच साहित्य प्रभावी

By admin | Updated: March 18, 2015 00:44 IST

आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे.

सचिन परब : ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवातपुणे : आमच्या पिढीचे साहित्य समीक्षकांच्या मतानुसार साहित्य नसेलही; पण ते महत्त्वाचं आहे. ते पुस्तकापेक्षाही जास्त वाचले जाते. ते जगण्याच्या अधिक जवळ जाणारे असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. बहुतांश प्राध्यापक, लेखकरावांपेक्षा युवकांचे साहित्य किती तरी चांगले असल्याचे परखड मत पहिल्या अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सचिन परब यांनी मंगळवारी व्यक्त केले. एस. एम. जोशी सभागृहात पहिल्या अखिल भारतीय मराठी युवा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी परब बोलत होते. संमेलनाच्या कॉम्रेड गोविंद पानसरे व्यासपीठावर या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. हरी नरके आणि टेकरेलचे चेअरमन भूषण कदम उपस्थित होते. सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालय ते संमेलनस्थळ असा मार्ग असणाऱ्या या दिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष टेकरेल अकॅडमीचे संचालक महेश थोरवे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय झोंबाडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)मराठी बोलण्याची लाज वाटू देऊ नकामराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा मिळविण्याचे प्रयत्न होत असताना तरुणांनी मराठी बोलण्याची लाज वाटू देऊ नका, असे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके यांनी सांगितले. इतर भाषांचा आदर जरूर करा; मात्र आपल्या मातृभाषेची लाज वाटू देऊ नका, असे सांगून भविष्यात मराठीतच बोलण्याचा व स्वाक्षरी करण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.सध्याच्या युवा पिढीपुढे भाकरी आणि सेक्स हे दोन मोठे प्रश्न तयार झाले आहेत. अत्यंत ज्वलंत व जिव्हाळाचे हे प्रश्न तरुणाईला भेडसावत आहेत. मात्र, यांपैकी सेक्सची दखल घेऊन योग्य भूमिका मांडणारे साहित्यलेखन होत नाही.- प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ विचारवंततरुणांमध्ये संस्कारित विचारांचा अभाव : लक्ष्मीकांत देशमुखमाहितीचा प्रचंड साठा उपलब्ध असूनही त्यामध्ये ज्ञानाची कमतरता जाणवत आहे. स्वत: एखाद्या घटनेवर किंवा परिस्थितीवर विचार करणे, त्यावर चर्चा करणे, कुतूहलाने एखादी गोष्ट जाणून घेणे आता कमी झाले आहे, असे मत ज्येष्ठ सनदी अधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.देशमुख म्हणाले, ‘‘आजचा तरुण पुरोगामी होण्याऐवजी प्रतिगामी बनत चालला आहे. १९७०-८०च्या दशकामध्ये पुरोगामी विचार असणे ही फॅशन नव्हती, तर समाजाप्रति असलेली तळमळ होती. त्यामुळे प्रतिगामी बनत असलेल्या तरुणांनी विचार बदलले पाहिजेत. गरिबांसाठी तसेच अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी लेखनाचा हत्यार म्हणून वापर करणे, ही काळाची गरज आहे.’’मराठी युवा साहित्य संमेलनामधील सत्कार समारंभात ते बोलत होते. युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त अवधूत डोंगरे व रवी कोरडे आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त प्रदीप माने यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा मित्र मंडळचे सचिव भाऊसाहेब जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दगडू लोमटे, विजय कोलते, संमेलनाध्यक्ष सचिन परब उपस्थित होते. त्याच-त्याच साहित्यिकांना संमेलनात बोलावून जुनेच विषय उगाळत बसण्यापेक्षा तरुणांचे विचार ऐकून त्यांना साहित्य संमेलनात सामावून घेतले पाहिजे. यासाठी स्थानिक पातळीवर संमेलने भरवून विविध प्रकारचे साहित्य लिहिणाऱ्या तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.- दगडू लोमटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते