शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
6
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
7
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
9
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
10
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
11
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
12
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
13
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
14
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
15
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
16
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
17
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
18
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
19
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
20
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम

साहित्य संमेलन बडोद्यातच व्हावे!

By admin | Updated: July 5, 2017 03:56 IST

‘बडोदे येथे संमेलन आयोजित करण्यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने प्रस्ताव पाठवलेला आहे. परिषद ही साहित्य महामंडळाची

मयूर देवकर/लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘बडोदे येथे संमेलन आयोजित करण्यासाठी मराठी वाङ्मय परिषदेने प्रस्ताव पाठवलेला आहे. परिषद ही साहित्य महामंडळाची संलग्न संस्था असल्याने संमेलनाचा मान त्यांनाच मिळायला हवा. महामंडळाने अन्य स्थळांचा विचार तरी कशाला करावा,’ असा प्रश्न मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन दिल्लीत करण्याबाबतच्या साहित्य वर्तुळातील उत्साही चर्चांत ठाले-पाटील यांनी वर्ज्य सूर लावल्याने संमेलनस्थळावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ने दिल्ली येथे संमेलन भरविण्याचे रीतसर निमंत्रण दिल्यापासून साहित्यप्रेमींना हुरूप चढला आहे. बडोदे, पुणे, तळोधी बाळापूर (चंद्रपूर), हिवरा आश्रम (बुलडाणा) या ठिकाणांहूनही प्रस्ताव आले आहेत. मात्र, यंदा चर्चा केवळ दिल्लीचीच सुरू आहे. याबाबत ठाले-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘बडोदे येथे मोठ्या संख्येने मराठी लोक राहतात. सयाजीराव गायकवाड महाराजांनी मराठीचे प्रचंड काम तेथे केले आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून बडोदे अगदी योग्य स्थळ आहे,’ असेही ते म्हणाले.दरम्यान, गेल्या महिन्यात महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षेखाली नागपूर येथे पार पडलेल्या बैठकीत स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. समिती १० सप्टेंबर रोजी महामंडळाच्या बैठकीत अहवाल सादर करणार आहे.समितीच्या अहवालानंतरच निर्णयसंमेलन कुठे होणार, याचा अंतिम निर्णय स्थळ निवड समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे. समितीमध्ये घटक संस्थांचेही प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सर्वांच्या मतांनुसारच निर्णय होईल.- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ