शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साहित्यकृतीचे माध्यमांतर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:53 IST

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी साहित्य वर्तुळात नावाजली गेली आहे. या कादंबरीचे आता माध्यमांतर करण्यात आले आहे

राज चिंचणकरमुंबई : ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही कादंबरी साहित्य वर्तुळात नावाजली गेली आहे. या कादंबरीचे आता माध्यमांतर करण्यात आले आहे. याच नावाने ती मोठ्या पडद्यावर अवतीर्ण होण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे, या साहित्यकृतीवर बेतलेल्या चित्रकृतीने यापूर्वीच तीन राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर मोहोर उमटविली आहे. पुढील आठवड्यात ही चित्रकृती रसिकांच्या दरबारात रुजू होत आहे.स्मशानघाटावरील रूढी, तेथील प्रथा, समाजव्यवस्था यावर भाष्य करणारी ही कादंबरी चर्चेचा विषय झाली नसती, तर ते नवलच ठरले असते. ही कादंबरी खूप गाजली आणि तिला अमाप लोकप्रियताही मिळाली. अशा या दाहक विषयाला संजय कृष्णाजी पाटील यांनी हात घातला आहे. तिचे माध्यमांतर करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या लेखणीतून आतापर्यंत उतरलेल्या ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ यांसारख्या चित्रकृतींच्या मांदियाळीतील ‘दशक्रिया’ हे पुढचे पाऊल आहे. संदीप भालचंद्र पाटील या युवा दिग्दर्शकाने ही चित्रकृती दिग्दर्शित केली आहे.६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रादेशिक मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ट पटकथा (रूपांतरित) आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता अशा तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी ‘दशक्रिया’ या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच, ५४व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये तब्बल ११ पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले आहे. कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तसेच बर्लिन येथील ‘इंडिया वीक’ फेस्टिव्हल, एनएफडीसी ‘फिल्म बाजार’ यांसारख्या महोत्सवांसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे.