शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

अकरावीची दुसरी विशेष गुणवत्ता यादी जाहीर

By admin | Updated: August 23, 2016 20:05 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता.

२२,२७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी,  तिसऱ्या फेरीसाठी ४० हजार ४८१ जागा शिल्लक

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. या फेरीत २५ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलासाठी अर्ज केला होता. त्यापैकी एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश बदल देण्यात आला असून, ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेषफेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दुसऱ्या विशेष फेरीसाठी अकरावीच्या एकूण ६२ हजार ७५४ जागा उपलब्ध होत्या. त्यातील २२ हजार २७३ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये ९ हजार ९१० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, तर ३ हजार १६२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २ हजार ८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. त्यामुळे एकूण १५ हजार ८० विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालयात प्रवेश देण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी सुमारे ७ हजार १९३ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीक्रमामधील महाविद्यालय मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून तिसऱ्या विशेष फेरीमध्ये पुन्हा अर्ज करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पहिल्या तीन पसंतीक्रमातील महाविद्यालयात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसोबत दुसऱ्या विशेष फेरीत प्रवेश बदलाच्या संधीपासून वंचित राहिलेल्या ३ हजार ४५० विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जुलै महिन्यात पार पडलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतरच तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यताआहे. तरी अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीसाठी अद्याप ४० हजार ४८१ जागा उपलब्ध आहेत.दहीहंडीच्या सुटीने प्रवेश वेळापत्रकात बदलजुन्या वेळापत्रकानुसार, दुसऱ्या विशेष फेरीमधील गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बुधवार व गुरुवारी म्हणजेच २४ आणि २५ आॅगस्ट रोजी संबंधित महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचे होते. मात्र राज्य शासनाने मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना गुरुवारी, २५ आॅगस्ट रोजी दहीहंडीनिमित्त सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे या दिवशी प्रवेश प्रक्रिया होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी २५ आॅगस्टऐवजी शुक्रवारी, २६ आॅगस्टला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहनही उपसंचालक कार्यालयाने केले आहे.कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय निश्चित करण्यात आलेले प्रवेश :कला १,४४०वाणिज्य १४,३८१विज्ञान ६,४५२एकूण २२,२७३