शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दिव्यातील रेल्वे घातपात : मुंब्रा पोलिसांकडे सबळ पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 03:56 IST

दिव्यातील रेल्वे घातपात प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले, तरी या टोळीचा पर्दाफाश

ठाणे : दिव्यातील रेल्वे घातपात प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले, तरी या टोळीचा पर्दाफाश करणारे मुंब्रा पोलीस त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या प्रकरणातील आरोपींच्या कबुलीजबाबाचे चित्रीकरणच उपलब्ध असल्याचा दावा मुंब्रा पोलिसांनी केला आहे. २४ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर ३५२ किलोग्रॅमचा गंजलेला रुळाचा तुकडा टाकून मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात घडविण्याचा प्रयत्न झाला होता. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. १३ एप्रिल रोजी मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी दानिश अकबर शेख, सूरज दिनेश भोसले, मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख, नजीर उस्मान सय्यद आणि जयेश नागेश पारे या पाच आरोपींना अटक केली होती. मुंब्रा येथील सराईत गुन्हेगार मौला मकानदार याच्या सांगण्यावरून आपण रेल्वे रुळावर गंजलेला लोखंडी रूळ ठेवला होता, अशी कबुली आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १४ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली. या पाचही आरोपींसह एका गुन्ह्यामध्ये तळोजा कारागृहात असलेल्या मौला मकानदारलाही ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीत घेतले. तेव्हापासून आरोपींच्या गुन्ह्यातील सहभागावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. आरोपी गर्दुल्ले असून, ते ३५० किलोचा लोखंडी रूळ उचलूच शकत नाहीत, मोबाइल फोनच्या लोकेशननुसार घटनेच्या वेळी एक आरोपी नाशिक येथे होता, अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने मुंब्रा पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. यासंदर्भात मुंब्रा पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचपैकी एक आरोपी मुंब्रा पोलिसांचा खबरी होता. त्यानेच संपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली होती. परंतु गुन्ह्यातील त्याचा सहभाग दुर्लक्ष करण्यासारखा नसल्याचे दिसल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. मौला मकानदार हा सराईत गुन्हेगार आहे, तर आरोपींपैकी एकाच्या मोबाइल फोनचे लोकेशन घटनेच्या वेळी नाशिक येथे होते, याचा अर्थ तो आरोपी घटनास्थळी नव्हता, असा होत नाही. ३५० किलोचा रूळ उचलून रेल्वे रुळावर ठेवण्याइतपत शारीरिक क्षमता आरोपींमध्ये नाही, असा आणखी एक युक्तिवाद लोहमार्ग पोलिसांनी केला. पण प्रत्यक्षात ३५२ किलो वजन पाच व्यक्तींसाठी उचलणे तेवढे कठीणही नाही, असे मुंब्रा पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वाद केवळ श्रेय लाटण्यासाठीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद केवळ श्रेय लाटण्याचा आहे. आरोपींनी रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न अवघ्या २ हजारांच्या पैजेसाठी केला होता. अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेची कामगिरी लोहमार्ग पोलिसांनी करणे अपेक्षित असताना, ती मुंब्रा पोलिसांनी केली. आता या आरोपींकडून आणखी कोणकोणती माहिती काढता येईल, त्यांचे आणखी साथीदार आहेत का, हे तपासणे गरजेचे आहे. भविष्यात त्यांनी असे गुन्हे करू नयेत यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी आरोपींची तळी उचलून त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न होत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.