शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रमोळी झोपडीतील ‘त्या 486 जणी बनल्या ‘वंशाचा दिवा’!

By admin | Updated: January 2, 2017 17:39 IST

वंशाचा दिवा म्हणून मुलगाच असावा, अशी समाजाची बनलेली सर्वसाधारण मानसिकता. मात्र, या मानसिकतेच्या पलिकडे जाऊन चांद्रमोळी झोपडीतील गोरगरीब कुटुंबाने ४८६ मुलींना ‘वंशाचा दिवा’ मानले आहे

ऑनलाइन लोकमत/संतोष वानखडे

वाशिम, दि 2 - वंशाचा दिवा म्हणून मुलगाच असावा, अशी समाजाची बनलेली सर्वसाधारण मानसिकता. मात्र, या मानसिकतेच्या पलिकडे जाऊन चंद्रमोळी झोपडीतील गोरगरीब कुटुंबाने ४८६ मुलींना ‘वंशाचा दिवा’ मानले आहे. गत आठ वर्षात दारिद्र्य रेषेखालील २४३ कुटुंबाने दोन मुलींवरच कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे.
 
दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणा-या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला शासनाकडून आर्थिक स्वरुपात मदत दिली जाते. या योजनेंतर्गत लाभ मिळावा म्हणून २००९ ते २०१६ या वर्षात जिल्ह्यातील २४३ गरीब कुटुंबाने आरोग्य विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. ज्यांना या योजनेची माहिती नाही, अशा कुटुंबांनी अजूनही अर्ज सादर केले नाही. त्यामुळे हा आकडा यापेक्षाही मोठा असू शकतो. 
 
२४३ चंद्रमोळी झोपडीतही ४८६ जणी वंशाचा दिवा बनल्या आहेत. समाजात अजूनही मुलगाच वंशाचा दिवा आहे, अशी व्यापक मानसिकता आहे. मृत्यूनंतरचा विधी करण्यासाठी मुलगाच हवा, अशीही भावना आहे. यामुळेच एक तरी मुलगा असावा, अशी बहुतांश आई-वडिलांची इच्छा असते. याच इच्छेपोटी सधन समजल्या जाणा-या कुटुंबातही गर्भातच स्त्री-भ्रूण खुडले जाऊ लागले. आर्थिक सुबत्ता, प्रगत वैद्यकीय सुविधा या प्रमुख कारणांमुळे गर्भलिंग निदान करून स्त्री-भ्रूणहत्या करण्यात जिल्हाही मागे नव्हता. 
 
२०११ पर्यंत तर वाशिम जिल्हा लिंगगुणोत्तरात डेंजर झोनमध्ये होता. मुले, मुली यांच्यातील प्रमाण व्यस्त आहे. २०१३ नंतर जिल्हा प्रशासन, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थेने स्त्री भ्रूण हत्या टाळण्याबाबत जनजागृतीची व्यापक मोहिम राबविली. या मोहिमेची फलनिष्पत्ती आता दृष्टिपथात येत आहे. लिंग गुणोत्तर तर वाढले आहेच; शिवाय एक किंवा दोन मुलीवरच शस्त्रक्रिया करून मुलीलाच वंशाचा दिवा समजणा-या कुटुंबांची संख्याही समाधानकारक वाढत आहे. 
 
सन 2011 च्या जनगणनेत एक हजार मुलामागे जन्माला येणा-या मुलींचा आकडा ८५९ वर येऊन स्थिरावला होता. प्रशासन, स्वयंसेवी संघटनेने जागरुकता निर्माण केल्याने २०१६ मध्ये या आकड्यात कमालीची वाढ झाली. हा आकडा ९२५ वर पोहोचला असल्याचे आशादायी चित्र आहे.