शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नद्यांची पातळी घटली

By admin | Updated: June 28, 2014 23:25 IST

जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

नागोठणो :  जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.  परिसरातील नदीचे पाणी सुद्धा आटत चालले असल्याने नागोठणो पासून डोलवीपर्यंतच्या 45 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाटणसईच्या केटी बंधा:यातून  जे.एस. डब्लू. कंपनीकडून या सर्व गावांना पाणीपुरवठा केला जात असून अंबा नदीतील पाण्याची पातळी दोन ते अडीच फूट एवढय़ा कमी पातळीपर्यंत खाली आली आहे. सध्या दोनपैकी एकच पंपाद्वारे नदीतील पाणी खेचून ते पुढे पाठविले जात आहे. पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस पडला नाही, तर नदीत पाणीच राहणार नाही, असे प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट देवून पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. कोलाड येथून पाटबंधारे खात्यामार्फत कालव्याद्वारे या नदीत येणारे पाणी जर सोडले नाही, तर गंभीर समस्या उद्भवू शकेल असे बोलले जात आहे. 
 
पावसाअभावी  पेरण्या करपण्याच्या मार्गावर, शेतक:यांना फटका
नागोठणो : कोकणासह प्रत्येक जिल्ह्यातील शेतक:यांच्या तोंडचे पाणी सध्या पळाले आहे. पेरणी झाली असली तरी अत्यल्प पावसाने शेतक:यांचे सारे वेळापत्नकच विस्कटून गेले आहे . शेती वाचवण्यासाठी पाईप लावून पाणी शिंपडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील आठवडय़़ात गंभीर होण्याची चिन्हे आहेत. 
 मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यासाठी पीक-पाण्याची तयारीही केली गेली. शेतक:यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खत ओढणो, रान करणो, नांगरणो, बियाणांची उपलब्धता याच्या तयारीसाठी गेल्या आठवडय़ात धांदल उडाली होती. पण आता सर्व काही थंड पडले आहे. जूनच्या सुरु वातीस हमखास पाऊस येतो यावर विश्वास ठेवूनच भाताची धूळवाफ पेरणी पूर्ण झाली आहे. भाताची खुरपणी सुरू असताना अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाची हजेरी आठवडाभरात न लागल्यास पश्चिमेकडील भागातील भात पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
भाताची रोपे सुकू लागली
नेरळ : जून महिना संपत आला तरी कर्जत तालुक्यात चार इंच देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात भाताची रोपे टाकणा:या शेतक:यांच्या संकटात भर पडली आहे. कारण पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकू लागली आहेत . अनेक ठिकाणी भाताच्या रोपांचे राभ पिवळे पडल्याचे दिसत आहेत . 
 
1पावसाळ्यातील चार महिने शेतकरी आपल्या शेतात शेती करून  काळ्या मातीचे रक्षण करीत असतो. गत वर्षी जूनच्या तीन तारखेला पावसाने सुरु वात केली होती . नंतर सर्व शेतकरी भाताचे रोप तयार करण्यासाठी कामाला लागले होते . त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावून सर्व शेतक:याना दुबार रोप टाकण्याचे काम करावे लागले होते.यावर्षी जूनच्या दुस:या आठवडय़ात पाऊस सुरु  झाला . 
2जेमतेम चार - पाच दिवस कोसळलेला पाऊस थांबला. त्यामुळे भाताची रोपे सुकतांना शेतकरी पाहत आहे. अनेक शेतक:यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी पंप लावून भाताच्या रोपाला घालण्याचा प्रयत्न केला आहे . तरी देखील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणी पुरवठा यात फरक असल्याने भाताची रोपे सुकतांना ती हिरवीगार ठेवणो शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे . तालुक्यातील कोणत्याही शेतात भाताचे राभ सहा इंच पर्यंत वाढलेले दिसत नाही. 
3भाताचे रोप शेतात टाकल्यानंतर ते लावणीसाठी साधारण पंचवीस दिवसात तयार होते . यावर्षी पाऊस चार इंच देखील जून महिना संपत आला तरी झाला नाही . त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ होऊ शकली नाही . त्यात आणखी भर म्हणजे शेतातील भाताचे रोप सुकतांना शेतकरी पाहत आहेत . आणखी आठवडाभर पाऊस सुरु  झाला नाही तर सर्व शेतक:यांना पुन्हा भाताचे बियाणो विकत आणून त्याची राभ भरणी करावी लागणार आहे . या गोष्टी शेतक:यांना न परवडण्यासारख्या आहेत .