शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

नद्यांची पातळी घटली

By admin | Updated: June 28, 2014 23:25 IST

जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.

नागोठणो :  जून महिना संपत आला असून पावसाने अजूनही दडीच मारल्याने शेतकरी संकटात आले आहेत.  परिसरातील नदीचे पाणी सुद्धा आटत चालले असल्याने नागोठणो पासून डोलवीपर्यंतच्या 45 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पाटणसईच्या केटी बंधा:यातून  जे.एस. डब्लू. कंपनीकडून या सर्व गावांना पाणीपुरवठा केला जात असून अंबा नदीतील पाण्याची पातळी दोन ते अडीच फूट एवढय़ा कमी पातळीपर्यंत खाली आली आहे. सध्या दोनपैकी एकच पंपाद्वारे नदीतील पाणी खेचून ते पुढे पाठविले जात आहे. पुढील पाच-सहा दिवसांत पाऊस पडला नाही, तर नदीत पाणीच राहणार नाही, असे प्रत्यक्ष या ठिकाणाला भेट देवून पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. कोलाड येथून पाटबंधारे खात्यामार्फत कालव्याद्वारे या नदीत येणारे पाणी जर सोडले नाही, तर गंभीर समस्या उद्भवू शकेल असे बोलले जात आहे. 
 
पावसाअभावी  पेरण्या करपण्याच्या मार्गावर, शेतक:यांना फटका
नागोठणो : कोकणासह प्रत्येक जिल्ह्यातील शेतक:यांच्या तोंडचे पाणी सध्या पळाले आहे. पेरणी झाली असली तरी अत्यल्प पावसाने शेतक:यांचे सारे वेळापत्नकच विस्कटून गेले आहे . शेती वाचवण्यासाठी पाईप लावून पाणी शिंपडण्यात येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील आठवडय़़ात गंभीर होण्याची चिन्हे आहेत. 
 मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यासाठी पीक-पाण्याची तयारीही केली गेली. शेतक:यांनी मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. खत ओढणो, रान करणो, नांगरणो, बियाणांची उपलब्धता याच्या तयारीसाठी गेल्या आठवडय़ात धांदल उडाली होती. पण आता सर्व काही थंड पडले आहे. जूनच्या सुरु वातीस हमखास पाऊस येतो यावर विश्वास ठेवूनच भाताची धूळवाफ पेरणी पूर्ण झाली आहे. भाताची खुरपणी सुरू असताना अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे. पावसाची हजेरी आठवडाभरात न लागल्यास पश्चिमेकडील भागातील भात पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
भाताची रोपे सुकू लागली
नेरळ : जून महिना संपत आला तरी कर्जत तालुक्यात चार इंच देखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात भाताची रोपे टाकणा:या शेतक:यांच्या संकटात भर पडली आहे. कारण पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकू लागली आहेत . अनेक ठिकाणी भाताच्या रोपांचे राभ पिवळे पडल्याचे दिसत आहेत . 
 
1पावसाळ्यातील चार महिने शेतकरी आपल्या शेतात शेती करून  काळ्या मातीचे रक्षण करीत असतो. गत वर्षी जूनच्या तीन तारखेला पावसाने सुरु वात केली होती . नंतर सर्व शेतकरी भाताचे रोप तयार करण्यासाठी कामाला लागले होते . त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावून सर्व शेतक:याना दुबार रोप टाकण्याचे काम करावे लागले होते.यावर्षी जूनच्या दुस:या आठवडय़ात पाऊस सुरु  झाला . 
2जेमतेम चार - पाच दिवस कोसळलेला पाऊस थांबला. त्यामुळे भाताची रोपे सुकतांना शेतकरी पाहत आहे. अनेक शेतक:यांनी आपल्या शेतातील विहिरीचे पाणी पंप लावून भाताच्या रोपाला घालण्याचा प्रयत्न केला आहे . तरी देखील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणी पुरवठा यात फरक असल्याने भाताची रोपे सुकतांना ती हिरवीगार ठेवणो शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे . तालुक्यातील कोणत्याही शेतात भाताचे राभ सहा इंच पर्यंत वाढलेले दिसत नाही. 
3भाताचे रोप शेतात टाकल्यानंतर ते लावणीसाठी साधारण पंचवीस दिवसात तयार होते . यावर्षी पाऊस चार इंच देखील जून महिना संपत आला तरी झाला नाही . त्यामुळे भाताच्या रोपाची वाढ होऊ शकली नाही . त्यात आणखी भर म्हणजे शेतातील भाताचे रोप सुकतांना शेतकरी पाहत आहेत . आणखी आठवडाभर पाऊस सुरु  झाला नाही तर सर्व शेतक:यांना पुन्हा भाताचे बियाणो विकत आणून त्याची राभ भरणी करावी लागणार आहे . या गोष्टी शेतक:यांना न परवडण्यासारख्या आहेत .