शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पत्रव्यवहाराबाबतची याचिका फेटाळली

By admin | Updated: November 11, 2015 02:07 IST

मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या याकूब मेमनच्या दया अर्जावर विचार करून त्याच्या फाशीच्या शिक्षेत कपात करण्यात यावी

मुंबई: मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या याकूब मेमनच्या दया अर्जावर विचार करून त्याच्या फाशीच्या शिक्षेत कपात करण्यात यावी, अशी विनंती करणारी पत्रे राजकीय नेत्यांनी राष्ट्रपतींना पाठवली होती. या पत्रव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अलीकडेच उच्च न्यायालयाने फेटाळली.अनेक आमदारांनी आणि मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार याकूब मेमनच्या दया अर्जावर विचार करून त्याच्या फाशीच्या शिक्षेत कपात करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्रे राष्ट्रपतींना पाठवली. या पत्रांबाबत अनेक वर्तमानपत्रांतून समजल्याने चंद्रप्रकाश सिंग यांनी या पत्रव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. याचिकेनुसार, याकूबने पोलिसांपुढे स्वत: शरण आल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असे पत्रे पाठवणाऱ्या राजकीय नेत्यांचे म्हणणे होते. याकूबला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. खूप वर्षे खटला चालल्यानंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनीही फाशीची शिक्षा योग्य ठरविली.कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतरगी दयेच्या अर्जावर विचार करून फाशीच्या शिक्षेत कपात करण्यात यावी, अशी पत्रे नेत्यांनी आणि नगरसेवकांनी लिहिणे अयोग्य आहे. या पत्रव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सतीश मिश्रा यांनी खंडपीठापुढे केली. (प्रतिनिधी)