शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जिजाऊच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या - पंकजा मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 21:30 IST

ज्या जिजाऊने शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ही बाब चिंताजनक असून मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या

अशोक इंगळेसिंदखेडराजा : ज्या जिजाऊने शिवबा घडविला, त्या महाराष्ट्रात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी आहे. ही बाब चिंताजनक असून मुलींच्या जन्माचे स्वागत आपण प्रत्येकाने करावे आणि भविष्यात जिजाऊंच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवू या, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ना.पांडुरंग फुंडकर हे होते तर व्यासपिठावर खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.शशिकांत खेडेकर, आ.संजय कुटे, आ.अ‍ॅड.आकाश फुंडकर, माजी आ.तोताराम कायंदे, माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, मुकाअ षण्मुखराजन एस., विनोद वाघ, जि.प.सदस्या सरस्वती वाघ, राजेश लोखंडे, ज्योती खेडेकर यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात पंकजा मुंढे पुढे म्हणाल्या की, मुलींना जन्म घेण्याचा अधिकार नाकारल्या जात आहे. मुलगी कधीही आई-वडिलांना अंतर देत नाही, मग आपण का त्यांना नाकारतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या मातेच्या उदरात मुलगी असते, ती माता अश्रू ढाळते, ही प्रवृत्ती बदलण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली. या योजनेचा लाभ म्हणजे एका मुलीवर कुटुंब नियोजन करेल, त्या मुलीच्या नावे ५० हजार रुपये डिपॉझीट करण्यात येईल. दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणा-याला त्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी २५-२५ हजार रुपये टाकण्यात येतील. त्या पैशाच्या व्याजावर मुलीचे संगोपन, शिक्षण, आरोग्य यावर खर्च केले जातील. बेटी बचाव बेटी पढाव ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. त्याच धर्तीवर आम्ही भाग्यश्री योजना सुरू केली.

ग्रामविकास या योजनेबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब आहेत की २५-२५ वर्ष या रस्त्यकडे कोणी पाहिले नाही. ग्रामविकास योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ११४ कोटीची कामे मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार कि.मी. रस्त्याचे काम येत्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. माझ्या खात्याचा कणा अंगणवाडी सेविका आहे. त्यांच्या मानधनात वाढ करुन २८० कोटीचा बोजा वाढला आहे. येत्या अधिवेशनात ३८० कोटी वाढीव बजेट मंजूर करुन त्यांची भाऊबीज ही दुप्पटीने वाढणार आहे.  संघर्ष यात्रेचा शुभारंभ जिजाऊ मातेचे दर्शन घेवून याच नगरीतून केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात परिवर्तन झाले. पाच वर्षात महाराष्ट्राचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सर्वप्रथम पंकजा मुंडे यांचेहस्ते माझी कन्या भाग्यश्री या रथाची फित कापून शुभारंभ केला. ही रथयात्रा सिं.राजा ते चोंढी पर्यंत आणि नायगाव पर्यंत जाणार आहे.

एकाच मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या मातांचा सत्करयावेळी एका मुलीवर कुटुंब नियोजन करणा-या प्रणाली अविनाश दिवाले, श्रावणी दिलीप चव्हाण, सविता संजय कुलथे, प्रणीता समाधान चौधरी या पाच महिलांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान ना.पंकजा मुंडे यांनी केला. त्याच बरोबर वक्तृत्व स्पर्धेतील मुलींचा सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तव