शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

होऊन जाऊ द्या दूध का दूध ! नामोल्लेख न करता दानवेंचा खोतकरांवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 05:45 IST

भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चित्र रंगवले जात आहे. त्यात तथ्य नाही. काही तुमचे मुद्दे असतील, तसे काही माझेही मुद्दे आहेत. ते सारे दूर ठेवून आपण एका व्यसपीठावर येऊन चर्चा केली पाहिजे.

जालना : भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे, हे चित्र रंगवले जात आहे. त्यात तथ्य नाही. काही तुमचे मुद्दे असतील, तसे काही माझेही मुद्दे आहेत. ते सारे दूर ठेवून आपण एका व्यसपीठावर येऊन चर्चा केली पाहिजे. ‘दूध का दूध दूध’ केले पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला.रविवारी शहरातील विविध भागात दानवे यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन झाले. तसेच येथील विघ्ने लॉन्सवर ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत नाव न घेता खोतकरांवर हल्ला चढविला.दानवे म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून आपण राजकारणात आहोत. १९९९ पासून खासदार या नात्याने जालना शहराशी संबंध आला. त्यामुळे गेल्या २० वर्षांत जालना शहराच्या विकासासाठी कोणत्या नेत्याने काय केले, याचा उहापोह सर्व नेत्यांना एका व्यासपीठावर बोलावून झाला पाहिले. यावर चर्चा झाली पाहिजे. त्यातूनच कळेल की, जालन्याच्या विकासासाठी कोणी काय केले? तेव्हाच ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल असे थेट आव्हान दानवे यांनी दिले.जालना बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहाराची तुलना त्यांनी थेट लालू प्रसाद यांच्या घोटाळ्यासोबत केली. सध्या बाजार समितीचे सभापती हे अर्जुन खोतकर आहेत. विशेष म्हणजे ही टीका करत असताना बाजार समितीचे उपसभापती आणि त्यांचे चुलत बंधू भास्कर दानवे हे व्यासपीठावर होते.दानवे म्हणाले, मी गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहे. आपण साधे आणि गरीब आहोत. गरीब मी दोन्ही अर्थाने आहे. पैशाने देखील गरीबच आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप आहे, हे चुकीचे आहे. एकदा तुम्ही आणि मी एकत्रीत येऊन विविध मुद्यांवर चर्चा करू असे खुले आवाहनही त्यांनी यावेळी खोतकरांना केले.राजकारणात ‘बाप’दुसऱ्या एका कार्यक्रमात दानवे यांनी राजकारणात आपण सगळ्यांचे ‘बाप’ असल्याचे सांगितले. ‘मातोश्री’वर मला प्रवेश देऊ नये म्हणून स्थानिक नेत्याने प्रयत्न केले ही बाब सर्रास चुकीची आहे. हे नेते परदेशात असताना येथे शिवसेनेचा पाच जिल्ह्यांतील महत्वाचा मेळावा होतो, यावरूनच ते कोणत्या वाटेवर आहेत हे सांगण्याची गरज नसल्याचेही दानवे यांनी सांगितले. 

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवे