शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

बळीराजा सुखी होऊ दे!

By admin | Updated: July 28, 2015 04:25 IST

‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले

- सचिन कांबळे,  पंढरपूर‘राज्यात चांगला पाऊस पडू दे, आमचा शेतकरी, सामान्य माणूस सुखी होऊ दे, सर्वसामन्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे पंढरीनाथाला घातले असून, ते निश्चित पूर्ण होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.आषाढीच्या महासोहळ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी केली. या पूजेनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही दिवसांत पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. जरी दुष्काळाची परिस्थिती आलीच तर, आमचे सरकार तयारीत आहे. या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने उपस्थित होते. १६ वर्षांपासून वारी राघोजी धांडे हे गेल्या १६ वर्षांपासून पायी यात्रा करतात. आम्हाला विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिळेल, असे वाटले नव्हते. मुख्यमंत्र्यांबरोबर शासकीय पूजेचा मान मिळाल्याचे सांगताच आम्हाला फारच आनंद झाल्याचे राघोजी धांडे यांनी सांगितले.हिंगोलीच्या दाम्पत्याला पूजेचा मानमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्याचा मान ‘मानाचे वारकरी’ म्हणून संगीता व राघोजी नारायण धांडे (पिंपरी खुर्द, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) या दाम्पत्याला मिळाला. या वेळी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांनी मानाच्या वारकऱ्यांना एसटी बसचा वर्षभराचा मोफत पास देऊन सत्कार केला.दुष्काळी लढ्यासाठी सज्ज महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरू अमरनाथ यात्रेमध्ये अडकले आहेत. या यात्रेकरूंची माहिती घेण्यासाठी राज्यातून दिल्लीला दोन अधिकारी पाठविले आहेत. ते माहिती घेऊन यात्रेकरूंना सुखरूप घरी पोहोचवतील. राज्यात दुष्काळ निर्माण झाल्यास त्यासाठी सरकारने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कृत्रिम पावसाची तयारी -कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारची सर्व यंत्रणा सज्ज आहे. यासाठी विमान आले आहे. औरंगाबादमध्ये संभाजीनगरला रडार व इतर सर्व यंत्रणा कार्यरत आहे. दोन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास, हवामान खात्याकडून सूचना घेऊन कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.