शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

ऑगस्ट क्रांती मैदानाकडे सत्ताधा-यांची पाठ

By admin | Updated: August 9, 2015 13:30 IST

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. क्रांतीदिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहून मानवंदना अर्पण करण्याची परंपरा आहे, मात्र विद्यमान सरकारला हुतात्म्यांचा विसर पडल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

महात्मा गांधीजींनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून १९४२ मध्ये ब्रिटिश सरकार चले जाव- छोडो भारत असा इशारा दिला होता. या मैदानात ९ ऑगस्ट रोजी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. आज सकाळपासून विविध समाजसेवी संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र दुपारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री मैदानाकडे न फिरकल्याने नाराजी व्यक्त होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होत आहे, ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र विद्यमान सत्ताधा-यांनी ही परंपरा मोडणे दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.