शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

ऑगस्ट क्रांती मैदानाकडे सत्ताधा-यांची पाठ

By admin | Updated: August 9, 2015 13:30 IST

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात सत्ताधारी बाकांवरील मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. क्रांतीदिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांनी उपस्थित राहून मानवंदना अर्पण करण्याची परंपरा आहे, मात्र विद्यमान सरकारला हुतात्म्यांचा विसर पडल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

महात्मा गांधीजींनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून १९४२ मध्ये ब्रिटिश सरकार चले जाव- छोडो भारत असा इशारा दिला होता. या मैदानात ९ ऑगस्ट रोजी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. आज सकाळपासून विविध समाजसेवी संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र दुपारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री मैदानाकडे न फिरकल्याने नाराजी व्यक्त होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न होत आहे, ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्र्यांनी येऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र विद्यमान सत्ताधा-यांनी ही परंपरा मोडणे दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.