शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारकडे तरुणाईची पाठ

By admin | Updated: August 2, 2016 03:25 IST

शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

जव्हार : मुंबई, ठाणे, वसई आणि नाशिकपासून नजीकच्या अंतरावर असूनही शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. हिरडपाडा आणि काळमांडवी हे धबधबे पाहतच राहावे, असे आहेत. त्याशिवाय इतर अनेक धबधब्यांमुळे तरुणाईला सहज भुरळ पडावी, अशी निसर्गाची ओतप्रोत भरून राहिलेली संपदा असतानाही पर्यटकांचा प्रतिसाद हवा तसा न मिळणे खरंतर आत्मपरीक्षणाचा विषय ठरावा.पावसाळ्यातील पर्यटनाला त्यात विशेषकरून शनिवार, रविवार म्हणजे पर्वणीच ठरावी. इकडे एसटीने सहज पोहोचता येणे शक्य आहे. खासगी वाहनांनाही येण्यासाठी चांगले रस्ते असल्याने येथील पावसाळी पर्यटन वाढणे शक्य आहे. येथील रस्त्यांवर ढाबासंस्कृती विकास पावत असल्याने चांगला पाहुणचार मिळतो. पावसाळी वातावरणात चुलीवरचे तिखट जेवण आणि नागलीची (नाचणी) भाकरी म्हणजे आहा... म्हणावे लागेल असाच बेत असतो. पावसाळ्याच्या काळात शहरातील हनुमान व सनसेट पॉइंटवर पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते. जव्हार संस्थानचे मानबिंदू असणाऱ्या जयविलास पॅलेसची झालेली दुरवस्था येथील दुर्लक्षित कारभाराचे चित्रण करते. जुना राजवाडा कोसळण्याच्या स्थितीत असून ऐतिहासिक शिरपामाळचीसुद्धा म्हणावी तशी व्यवस्था राखण्यात आलेली नाही.जव्हार शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून पडणारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्यापर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो. हा धबधबा लेंडी नदीवरून पडतो. वर्षा सहलीकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.या ठिकाणांचा विकास झाला तर येथील आदिवासी युवकांना रोजगार मिळेल व पर्यटकांनाही स्वस्त तसेच मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेली जागा आहे. पर्यटन खाते दुर्लक्ष करीत असल्याने येथे तारांकित दर्जाची हॉटेल्स नसल्याने अनेकदा पर्यटक इंटरनेटवरून टेहळणी करूनच नाक मुरडतात. काळमांडवी पर्यटन समिती धबधब्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करताना दिसते. मात्र पर्यटन विकास विभाग उदासीन असल्यामुळे समितीच्या सदस्यांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतो. (वार्ताहर)>काळमांडवी धबधबा जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या केळीचापाडा या गावातून ३ किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव काळमांडवी असे पडले आहे अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक गर्दी करतंना दिसतात. या धबधब्याचे डोह जास्त खोल नसल्याने पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात, उन्हाळ्यात धबधब्यापर्यंत जायला काळमांडवी पर्यटन समितीने बैलगाडीची व राहायची व्यवस्था केलेली आहे, तसेच धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला गाइडही मिळतो. मात्र, पावसाळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो व गावातच वाहने पार्क करावी लागतात.>हिरडपाडा धबधबा विकसित करण्यासाठी रिलिंग व पेव्हरब्लॉक बसवणे, निरीक्षण टॉवर, सौरदिवे बसवणे तसेच धबधबा परिसरातील स्थानिक व शासकीय जागेला फेनसिंग करणे, अशी कामे शासनाकडून मंजूर झाली असून थोड्याच दिवसांत हे काम सुरू होईल. - दर्शन ठाकूर, परिक्षेत्र वनअधिकारी, वन विभाग, (उत्तर जव्हार)कसे याल.? मुंबई - घोडबंदर महामार्गे मस्तान नाक्यावरून विक्रमगडमार्गे जव्हारला येणे शक्य आहे. शिवाय, ठाणे-भिवंडी-वाडा-जव्हार असा १२० किमीचा प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत जव्हारच्या धबधब्यांपर्यंत पोहोचवितो. नाशिक-जव्हार ५८ किमीचा रस्ता असल्याने नाशिककरांना हे अत्यंत जवळचे पावसाळी पर्यटन असू शकते.