शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जव्हारकडे तरुणाईची पाठ

By admin | Updated: August 2, 2016 03:25 IST

शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

जव्हार : मुंबई, ठाणे, वसई आणि नाशिकपासून नजीकच्या अंतरावर असूनही शहरी पर्यटकांपासून दुरावल्याने पर्यटनाच्या दृष्टीने मागासलेल्या जव्हारकडे शासनाचेही दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. हिरडपाडा आणि काळमांडवी हे धबधबे पाहतच राहावे, असे आहेत. त्याशिवाय इतर अनेक धबधब्यांमुळे तरुणाईला सहज भुरळ पडावी, अशी निसर्गाची ओतप्रोत भरून राहिलेली संपदा असतानाही पर्यटकांचा प्रतिसाद हवा तसा न मिळणे खरंतर आत्मपरीक्षणाचा विषय ठरावा.पावसाळ्यातील पर्यटनाला त्यात विशेषकरून शनिवार, रविवार म्हणजे पर्वणीच ठरावी. इकडे एसटीने सहज पोहोचता येणे शक्य आहे. खासगी वाहनांनाही येण्यासाठी चांगले रस्ते असल्याने येथील पावसाळी पर्यटन वाढणे शक्य आहे. येथील रस्त्यांवर ढाबासंस्कृती विकास पावत असल्याने चांगला पाहुणचार मिळतो. पावसाळी वातावरणात चुलीवरचे तिखट जेवण आणि नागलीची (नाचणी) भाकरी म्हणजे आहा... म्हणावे लागेल असाच बेत असतो. पावसाळ्याच्या काळात शहरातील हनुमान व सनसेट पॉइंटवर पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते. जव्हार संस्थानचे मानबिंदू असणाऱ्या जयविलास पॅलेसची झालेली दुरवस्था येथील दुर्लक्षित कारभाराचे चित्रण करते. जुना राजवाडा कोसळण्याच्या स्थितीत असून ऐतिहासिक शिरपामाळचीसुद्धा म्हणावी तशी व्यवस्था राखण्यात आलेली नाही.जव्हार शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा खूप मोठा व उंचीवरून पडणारा धबधबा आहे. हा धबधबा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्यापर्यंत जायला पुरेशी चांगली अशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य असा हिरडपाडा धबधबा आपणाला पाहायला मिळतो. हा धबधबा लेंडी नदीवरून पडतो. वर्षा सहलीकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे.या ठिकाणांचा विकास झाला तर येथील आदिवासी युवकांना रोजगार मिळेल व पर्यटकांनाही स्वस्त तसेच मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेली जागा आहे. पर्यटन खाते दुर्लक्ष करीत असल्याने येथे तारांकित दर्जाची हॉटेल्स नसल्याने अनेकदा पर्यटक इंटरनेटवरून टेहळणी करूनच नाक मुरडतात. काळमांडवी पर्यटन समिती धबधब्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करताना दिसते. मात्र पर्यटन विकास विभाग उदासीन असल्यामुळे समितीच्या सदस्यांकडून नाराजीचा सूर पाहायला मिळतो. (वार्ताहर)>काळमांडवी धबधबा जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या केळीचापाडा या गावातून ३ किमी अंतरावर आत गेल्यावर आपणाला काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवरून धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव काळमांडवी असे पडले आहे अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक गर्दी करतंना दिसतात. या धबधब्याचे डोह जास्त खोल नसल्याने पर्यटक पाण्यात उतरून एन्जॉय करतात, उन्हाळ्यात धबधब्यापर्यंत जायला काळमांडवी पर्यटन समितीने बैलगाडीची व राहायची व्यवस्था केलेली आहे, तसेच धबधब्यापर्यंत सुरक्षित जायला गाइडही मिळतो. मात्र, पावसाळ्यात मातीचा रस्ता असल्याने सरकता होतो व गावातच वाहने पार्क करावी लागतात.>हिरडपाडा धबधबा विकसित करण्यासाठी रिलिंग व पेव्हरब्लॉक बसवणे, निरीक्षण टॉवर, सौरदिवे बसवणे तसेच धबधबा परिसरातील स्थानिक व शासकीय जागेला फेनसिंग करणे, अशी कामे शासनाकडून मंजूर झाली असून थोड्याच दिवसांत हे काम सुरू होईल. - दर्शन ठाकूर, परिक्षेत्र वनअधिकारी, वन विभाग, (उत्तर जव्हार)कसे याल.? मुंबई - घोडबंदर महामार्गे मस्तान नाक्यावरून विक्रमगडमार्गे जव्हारला येणे शक्य आहे. शिवाय, ठाणे-भिवंडी-वाडा-जव्हार असा १२० किमीचा प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत जव्हारच्या धबधब्यांपर्यंत पोहोचवितो. नाशिक-जव्हार ५८ किमीचा रस्ता असल्याने नाशिककरांना हे अत्यंत जवळचे पावसाळी पर्यटन असू शकते.