शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कुष्ठरोग वसाहत होणार कधी स्मार्ट?

By admin | Updated: July 26, 2016 21:16 IST

एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना

रवींद्र देशमुख,

सोलापूर : एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना कुमठानाका परिसरातील कुष्ठरोग रूग्णालय आणि वसाहतीच्या भग्नतेकडे झगमगाटाच्या मागे लागलेल्या महापालिकेचे पुरते दूर्लक्ष झाले आहे. वसाहतीतील सर्वच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. रूग्ण पत्र्याचे शेड बांधून जीवन कंठत आहेत.

लेप्रसी हॉस्पीटल आणि वसाहतीमध्ये ह्यलोकमतह्ण पोहोचल्यानंतर रूग्णांना आपले मन मोकळे करण्याची आणि समस्या मांडण्याची संधी मिळाली. या वसाहतीमध्ये सध्या ६४ रूग्ण आपल्या परिवारासह राहून उपचार घेतात. बरेच रूग्ण तेथे २०, ३० आणि ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. रूग्णांना चपाती, डाळ भाताचं भोजन दिलं जातं तत्पूर्वी सकाळी नास्ता अन् चहा मिळतो. महापालिकेने २५ मे १९८४ रोजी सिव्हील सर्जनकडून लेप्रसी रूग्णालयाने ताब्यात घेतले. त्यानंतर वसाहतीची दुर्दशाच सुरू झाली...कुष्ठरोगाचे रूग्ण व्यंकटेश कुलकर्णी सांगत होते.

किसन केशभट्ट जोशी हे गेल्या चाळीस वर्षांपासून कुटुंबासह वसाहतीत राहून उपचार घेत आहेत... काय करावे हो, आता माझे मेडिकल रिपोर्ट सगळे चांगले आहेत. मी लेप्रसी निगेटीव्ह आहे; पण समाजात जावून राहू शकत नाही. लोक स्वीकारत नाहीत. आमच्या पिढ्या मात्र निरोगी जन्मल्या, हेच सुदैव. एक मुलगी आहे. पुण्याला दिलंय तिला. तिचा संसार उत्तमपणे सुरू आहे. मी बारावी पास झाल्यानंतर मलेरिया सर्व्हीलन्स वर्कर म्हणून नोकरीला लागलो. मूळचा गुलबर्ग्याचा आहे... नोकरी उत्तमपणे सुरू होती; पण काम करीत असताना या रोगाची लागण झाली...याच आजाराची रूग्ण असलेल्या अनुसया कुलकर्णीबरोबर माझे लग्न झाले अन् आमचा संसार इथे सोलापुरात सुरू झाला...जोशी सांगत होते.

किसनराव म्हणाले,आमच्या वसाहतीला आता पुनर्वसनाची गरज आहे. सर्वत्र पडझड झाली आहे. बाहेरच्या लोकांनी अतिक्रमणही केले आहे. घरांच्या भिंती आणि छप्पर पडल्यामुळे आमचे लोक पत्र्याचे शेड उभारून राहत आहेत...व्यंकटेश कुलकर्णी यांनीही वसाहतीच्या अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. रमानाथ झा यांच्यासारखा एखादा अधिकारी आला पाहिजे. झा यांनीच ही वसाहत महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. त्यांना खूप सुधारणा करायच्या होत्या; पण त्यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याची नेहमीच बदली होते. पूर्वी १२५ एकराच्या विस्तीर्ण जागेत असलेली ही वसाहत आणि रूग्णालय अतिक्रमणामुळे आता केवळ आठ एकराची झाली आहे.-कुष्ठरोग वसाहतील पडझड झालेल्या घरांचे बांधकाम करावे. महापालिकेने आम्हाला उत्तमपणे आसरा देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मोकळ्या जागेत रूग्णांना उपयुक्त होतील, असे उपक्रम सुरू करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून अनुदान घ्यावे.- किसन जोशी, रूग्णमहापालिकेने आमची दूर्दशा केली आहे. या वसाहतीकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिकेचा कोणताही आरोग्य अधिकारी टिकून राहत नाही. त्यामुळे आमच्या समस्या टिकून राहून सोडविणार तरी कोण? आमची अशी अवस्था करणाऱ्या महापालिकेला महारोग्यांचा शाप लागेल.- व्यंकटेश कुलकर्णी