शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कुष्ठरोग वसाहत होणार कधी स्मार्ट?

By admin | Updated: July 26, 2016 21:16 IST

एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना

रवींद्र देशमुख,

सोलापूर : एकेकाळच्या दुर्धर आजारामुळे अर्थात कुष्ठरोग झाल्यामुळे समाजापासून बाजुला ठेवलेल्या या रोगाच्या रूग्णांना आजही भणंग जीवन जगावे लागत असून, एकीकडे स्मार्ट सिटीची लगबग सुरू असताना कुमठानाका परिसरातील कुष्ठरोग रूग्णालय आणि वसाहतीच्या भग्नतेकडे झगमगाटाच्या मागे लागलेल्या महापालिकेचे पुरते दूर्लक्ष झाले आहे. वसाहतीतील सर्वच घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. रूग्ण पत्र्याचे शेड बांधून जीवन कंठत आहेत.

लेप्रसी हॉस्पीटल आणि वसाहतीमध्ये ह्यलोकमतह्ण पोहोचल्यानंतर रूग्णांना आपले मन मोकळे करण्याची आणि समस्या मांडण्याची संधी मिळाली. या वसाहतीमध्ये सध्या ६४ रूग्ण आपल्या परिवारासह राहून उपचार घेतात. बरेच रूग्ण तेथे २०, ३० आणि ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. रूग्णांना चपाती, डाळ भाताचं भोजन दिलं जातं तत्पूर्वी सकाळी नास्ता अन् चहा मिळतो. महापालिकेने २५ मे १९८४ रोजी सिव्हील सर्जनकडून लेप्रसी रूग्णालयाने ताब्यात घेतले. त्यानंतर वसाहतीची दुर्दशाच सुरू झाली...कुष्ठरोगाचे रूग्ण व्यंकटेश कुलकर्णी सांगत होते.

किसन केशभट्ट जोशी हे गेल्या चाळीस वर्षांपासून कुटुंबासह वसाहतीत राहून उपचार घेत आहेत... काय करावे हो, आता माझे मेडिकल रिपोर्ट सगळे चांगले आहेत. मी लेप्रसी निगेटीव्ह आहे; पण समाजात जावून राहू शकत नाही. लोक स्वीकारत नाहीत. आमच्या पिढ्या मात्र निरोगी जन्मल्या, हेच सुदैव. एक मुलगी आहे. पुण्याला दिलंय तिला. तिचा संसार उत्तमपणे सुरू आहे. मी बारावी पास झाल्यानंतर मलेरिया सर्व्हीलन्स वर्कर म्हणून नोकरीला लागलो. मूळचा गुलबर्ग्याचा आहे... नोकरी उत्तमपणे सुरू होती; पण काम करीत असताना या रोगाची लागण झाली...याच आजाराची रूग्ण असलेल्या अनुसया कुलकर्णीबरोबर माझे लग्न झाले अन् आमचा संसार इथे सोलापुरात सुरू झाला...जोशी सांगत होते.

किसनराव म्हणाले,आमच्या वसाहतीला आता पुनर्वसनाची गरज आहे. सर्वत्र पडझड झाली आहे. बाहेरच्या लोकांनी अतिक्रमणही केले आहे. घरांच्या भिंती आणि छप्पर पडल्यामुळे आमचे लोक पत्र्याचे शेड उभारून राहत आहेत...व्यंकटेश कुलकर्णी यांनीही वसाहतीच्या अवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. रमानाथ झा यांच्यासारखा एखादा अधिकारी आला पाहिजे. झा यांनीच ही वसाहत महापालिकेच्या ताब्यात घेतली होती. त्यांना खूप सुधारणा करायच्या होत्या; पण त्यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याची नेहमीच बदली होते. पूर्वी १२५ एकराच्या विस्तीर्ण जागेत असलेली ही वसाहत आणि रूग्णालय अतिक्रमणामुळे आता केवळ आठ एकराची झाली आहे.-कुष्ठरोग वसाहतील पडझड झालेल्या घरांचे बांधकाम करावे. महापालिकेने आम्हाला उत्तमपणे आसरा देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मोकळ्या जागेत रूग्णांना उपयुक्त होतील, असे उपक्रम सुरू करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास राज्य सरकारकडून अनुदान घ्यावे.- किसन जोशी, रूग्णमहापालिकेने आमची दूर्दशा केली आहे. या वसाहतीकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिकेचा कोणताही आरोग्य अधिकारी टिकून राहत नाही. त्यामुळे आमच्या समस्या टिकून राहून सोडविणार तरी कोण? आमची अशी अवस्था करणाऱ्या महापालिकेला महारोग्यांचा शाप लागेल.- व्यंकटेश कुलकर्णी