शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By admin | Updated: May 5, 2016 01:41 IST

शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा.

लातूर : शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. केंद्र व राज्य शासनाने विचारविनिमय करुन त्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.सेनेतर्फे लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणी पुरवठा, १०० ग्रामपंचायतींना तीन हजार लिटर्सची प्रत्येकी एक पाण्याची टाकी तसेच शहरात कचरा कुंड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभेत ठाकरे म्हणाले, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, ते पाहण्याचे काम शिवसैनिकांचे आहे़ खचलेल्या शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी दिलासा दिला पाहिजे़ दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल.मी भाषणासाठी आलेलो नाही, मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या येथील जनतेला भेटायला, दिलासा द्यायला आलो आहे़ भाषणे करणारे दुसरे. आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन् दुष्काळावर राजकारणही करत नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. खा. सुळे यांनी काही दिवसांपूर्वी या भागाचा दौरा केला होता.सेनेतर्फे दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या, जनावरांसाठी सिमेंटचे हौद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. शिवजल क्रांती योजनेसाठी भैरवनाथ शुगर उद्योग समुहाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी ५१ लाखांचा धनादेश उद्धव यांच्याकडे सुपूर्द केला.‘शिवजलक्रांती योजनेस प्रोत्साहन देणार’बार्शी (सोलापूर) व मराठवाड्यासह अनेक भागात शिवसैनिकांनी चांगले काम केले असून, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना मदत करण्यास शिवसेना मागे राहणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी बार्शी येथे दिली. परंडा- बार्शी तालुक्यातील योजनेच्या कामांची ठाकरे यांनी पाहणी केली़