शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

By admin | Updated: May 5, 2016 01:41 IST

शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा.

लातूर : शासनाने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी दिली, ही चांगली बाब आहे़ परंतु, यंदाच्या मोसमात पेरण्या झालेल्या नाहीत़ त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. केंद्र व राज्य शासनाने विचारविनिमय करुन त्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले.सेनेतर्फे लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणी पुरवठा, १०० ग्रामपंचायतींना तीन हजार लिटर्सची प्रत्येकी एक पाण्याची टाकी तसेच शहरात कचरा कुंड्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सभेत ठाकरे म्हणाले, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, ते पाहण्याचे काम शिवसैनिकांचे आहे़ खचलेल्या शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी दिलासा दिला पाहिजे़ दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल.मी भाषणासाठी आलेलो नाही, मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या येथील जनतेला भेटायला, दिलासा द्यायला आलो आहे़ भाषणे करणारे दुसरे. आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन् दुष्काळावर राजकारणही करत नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. दुसऱ्यांची उणीधुणी काढण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांसाठी तुम्ही काय केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबादमधील कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता केली. खा. सुळे यांनी काही दिवसांपूर्वी या भागाचा दौरा केला होता.सेनेतर्फे दुष्काळग्रस्तांना पाण्याच्या टाक्या, जनावरांसाठी सिमेंटचे हौद, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. शिवजल क्रांती योजनेसाठी भैरवनाथ शुगर उद्योग समुहाचे उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांनी ५१ लाखांचा धनादेश उद्धव यांच्याकडे सुपूर्द केला.‘शिवजलक्रांती योजनेस प्रोत्साहन देणार’बार्शी (सोलापूर) व मराठवाड्यासह अनेक भागात शिवसैनिकांनी चांगले काम केले असून, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांना मदत करण्यास शिवसेना मागे राहणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी बार्शी येथे दिली. परंडा- बार्शी तालुक्यातील योजनेच्या कामांची ठाकरे यांनी पाहणी केली़