शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

विधान परिषदेचे राजकारण रंगणार

By admin | Updated: October 27, 2014 02:47 IST

विधानसभेतील संख्याबळाच्या निमित्ताने सत्ताकारणाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना विधान परिषदेचे राजकारणही येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे

यदु जोशी, मुंबईविधानसभेतील संख्याबळाच्या निमित्ताने सत्ताकारणाची जोरदार चर्चा सध्या सुरू असताना विधान परिषदेचे राजकारणही येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे. भाजपाची राज्यात सत्ता येणार असली तरी वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेत ते अल्पमतात आहेत. त्यामुळे ज्येष्ठ सभागृहात भाजपाला बरीच कसरत करावी लागणार आहे. विधान परिषदेत सर्वाधिक सदस्य राष्ट्रवादीचे, त्याखालोखाल काँग्रेसचे आहेत. भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असली तरी त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये १० सदस्य संख्येचा फरक आहे. शिवसेनेबरोबर भाजपाने सत्ता स्थापन केली तर विधानसभेत त्यांना कुठलीही अडचण नाही. मात्र विधान परिषदेत युतीतील दोन्ही पक्षांचे मिळून तावडे, शेलार वगळल्यानंतर केवळ १५ सदस्य असतील. विधानसभेपेक्षाही भाजपाची जास्त कोंडी परिषदेत होऊ शकते. ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ करताना भाजपाची कसोटी लागेल.भाजपाने उद्या स्वबळावर सरकार बनविले तर परिषदेतील ९ सदस्य आणि ७ अपक्षांपैकी आपल्या समर्थक आमदारांना हाताशी धरून पुढे जाणे भाजपासाठी आणखीच कठीण असेल. अशावेळी सरकार स्थापनेसाठी भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ करणाऱ्या राष्ट्रवादीने हीच भूमिका विधान परिषदेतही घेतली तर भाजपासाठी तो मोठा दिलासा ठरेल. विधान परिषदेत विधेयक नामंजूर झाले तर ते विधानसभेत पुन्हा आणून सरकारला मंजूर करवून घेता येते. मात्र विधान परिषदेतील नव्या सरकारचे अल्पमत लक्षात घेता सरकारवर तांत्रिक पराभवाची नामुश्की वारंवार ओढवू शकते.लगेच नाही, पण काही महिन्यांनंतर एकदा सरकारला संख्याबळाच्या दृष्टीने स्थैर्य आले की विधान परिषदेचे सभापतिपद आपल्याकडे घेण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली जाण्याची शक्यता आहे.