शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

विधान परिषद बिनविरोध

By admin | Updated: June 4, 2016 03:45 IST

भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले

मुंबई : भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मागच्या दाराने का होईना, विधिमंडळात प्रवेश झाला.परिषदेच्या दहा जागांसाठी बारा अर्ज दाखल झाल्यामुळे घोडेबाजार होणार, अशी अटकळ होती. भाजपाचे पाच जण निवडून येणार असताना पक्षाने सहा उमेदवार दिले, तर भाजपाचेच मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांत खिंडार पाडण्यासाठीच भाजपाने चाल खेळल्याची चर्चा होती. मात्र, ‘निष्ठावंत की उपरे’ या वादामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढता काढता भाजपा नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंह यांच्या उमेदवारीला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. परंतु, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दरेकर आणि उत्तर भारतीयांचे नेते सिंह हे पक्षाला ‘मायलेज’ देऊ शकतात, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांच्या गळी उतरविल्याने अखेर प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी दहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अधिकृत घोषणा १२ जून रोजी करण्यात येईल.नारायण राणेंच्या ‘एन्ट्री’ने कॉंग्रेसला बळ गेल्या दोन वर्षांत सलग दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नारायण राणे यांचे या निवडणुकीतून विधान परिषदेत आगमन झाल्याने पक्षाचे बळ वाढले असून, सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला, तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून सेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले. हे दोन्ही पराभव पचवून राणे पुन्हा वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरले; पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही. शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.राणे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. शिवाय, आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते सरकारला सळो की पळो करून सोडू शकतात. महायुतीसदाभाऊ खोत विनायक मेटे प्रवीण दरेकर आर. एन. सिंह सुजितसिंह ठाकूर सुभाष देसाईदिवाकर रावतेआघाडीनारायण राणेरामराजे नाईक निंबाळकर धनंजय मुंडे