शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

विधान परिषद बिनविरोध

By admin | Updated: June 4, 2016 03:45 IST

भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले

मुंबई : भाजपाकडून प्रसाद लाड आणि अपक्ष मनोज कोटक यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. गेल्या दोन वर्षांत दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा मागच्या दाराने का होईना, विधिमंडळात प्रवेश झाला.परिषदेच्या दहा जागांसाठी बारा अर्ज दाखल झाल्यामुळे घोडेबाजार होणार, अशी अटकळ होती. भाजपाचे पाच जण निवडून येणार असताना पक्षाने सहा उमेदवार दिले, तर भाजपाचेच मनोज कोटक यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांत खिंडार पाडण्यासाठीच भाजपाने चाल खेळल्याची चर्चा होती. मात्र, ‘निष्ठावंत की उपरे’ या वादामुळे नाराजांच्या नाकदुऱ्या काढता काढता भाजपा नेत्यांच्या नाकीनऊ आले होते. प्रवीण दरेकर आणि आर. एन. सिंह यांच्या उमेदवारीला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध होता. परंतु, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दरेकर आणि उत्तर भारतीयांचे नेते सिंह हे पक्षाला ‘मायलेज’ देऊ शकतात, ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाराजांच्या गळी उतरविल्याने अखेर प्रसाद लाड आणि मनोज कोटक यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी दहाच उमेदवार राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. अधिकृत घोषणा १२ जून रोजी करण्यात येईल.नारायण राणेंच्या ‘एन्ट्री’ने कॉंग्रेसला बळ गेल्या दोन वर्षांत सलग दोनदा पराभवाला सामोरे गेलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नारायण राणे यांचे या निवडणुकीतून विधान परिषदेत आगमन झाल्याने पक्षाचे बळ वाढले असून, सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांचा शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला, तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: राणे कुडाळ मतदारसंघातून सेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून पराभूत झाले. हे दोन्ही पराभव पचवून राणे पुन्हा वांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरले; पण तिथेही त्यांचा निभाव लागला नाही. शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.राणे यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. शिवाय, आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते सरकारला सळो की पळो करून सोडू शकतात. महायुतीसदाभाऊ खोत विनायक मेटे प्रवीण दरेकर आर. एन. सिंह सुजितसिंह ठाकूर सुभाष देसाईदिवाकर रावतेआघाडीनारायण राणेरामराजे नाईक निंबाळकर धनंजय मुंडे