शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 05:42 IST

शासकीय इतमामात औरंगाबादमध्ये अंत्यसंस्कार

औरंगाबाद : फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा, जाणिवेचे समर्थ वाहक, मराठीतील कवी, विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ‘अस्मितादर्श’कार डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे (८१) यांचे सोमवारी मध्यरात्री औरंगाबादेत निधन झाले. मंगळवारी सायंकाळी येथील छावणी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मुली नंदिता व निवेदिता यांनी वडिलांच्या पार्थिवास अग्नी दिला.काही महिन्यांपासून डॉ. पानतावणे यांची प्रकृती बरी नव्हती. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पद्मश्री किताब घेण्यासाठी त्यांना दिल्लीला जाता आले नव्हते.भदंत प्रा. डॉ. सत्यपाल व भिक्खू संघाने सामूहिक बुद्धवंदना पठण केली. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुष्पचक्र वाहिले. सकाळपासून अनेक साहित्यिक व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, माजी मंत्री गंगाधर गाडे, आ. सुभाष झांबड, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, गंगाधर गाडे, सुधीर रसाळ, बाबा भांड, रा. रं. बोराडे, रतनकुमार पंडागळे, डॉ. ऋषिकेशकांबळे, मसापचे अध्यक्ष कौतिकरावठाले पाटील आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्रीडॉ. पानतावणे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ आणि साहित्याला वैचारिकतेचे अधिष्ठान देणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. व्यासंगी प्राध्यापक, कृतिशील विचारवंत आणि परखड समीक्षक म्हणून एक स्वतंत्र ओळख त्यांनीनिर्माण केली. त्यांनी वंचित-उपेक्षितांच्या प्रबोधनासह सक्षमीकरणासाठी दिलेले योगदान 'अस्मितादर्श’क म्हणून समाजाला सतत मार्गदर्शन करीत राहील. विशेषत: साहित्यिकांच्या नव्या पिढीला अभिव्यक्तीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्यासह तिच्या वैचारिक जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.दलित जाणिवेला आत्मभान देणारे साहित्यिकदलित साहित्याला वैचारिक दिशा देतानाच दलित जाणिवेला आत्मभान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने साहित्य आणि समाजाची फार मोठी हानी झाली आहे. डॉ. पानतावणे यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाच्या माध्यमातून शोषित, वंचितांना विचारपीठ मिळवून दिले. त्यांच्या साहित्यिक योगदानाची जागतिकस्तरावर दखल घेण्यात आली. वैचारिक लिखाणासोबतच समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान फार मोलाचे आहे. दलित चळवळीला विवेकाचे भान देणाऱ्या या ज्येष्ठ साहित्यिकाच्या निधनाने लोकमत परिवाराने आपला जवळचा मित्र गमावला आहे, अशा शब्दांत माजी खासदार व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Dr.Gangadhar Pantawaneडॉ. गंगधर पानतावणे