शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 06:49 IST

महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० जवानांशी छत्तीसगड सीमेवर झाली चकमक

गडचिरोली : जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील टेक्केमेटा ते मर्दानटोला पहाडाच्या परिसरातील जंगलात शनिवारी उडालेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यात चार पोलीस जवानही जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांची चहुबाजूंनी कोंडी केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील मोठा शस्त्रसाठाही जप्त केला.मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश?सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही मोठे नक्षल नेतेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला कडवा नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचा मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. तथापि, पोलिसांनी या शक्यतेला दुजोरा देण्यास नकार स्पष्ट दिला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, इतकेच पोलिसांनी सांगितले. मिलिंद तेलतुंबडे याच्या शिरावर ५० लाखांचे बक्षीस असून, पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले, पण तो हाती लागलेला नाही. गडचिरोलीच्या जंगलात चार वर्षांत झालेल्या मोठ्या चकमकी२२ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले.२४ एप्रिल, २०१८ : कसनासूर चकमकीमध्ये पळून जाणाऱ्या १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीपात्रात मिळाले.२५ एप्रिल, २०१८ : भामरागड तालुक्यातील नैनेरच्या जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले, तर आधीच्या चकमकीतील दोन मृतदेह मिळाले.१९ ऑक्टोबर, २०२० : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले.२१ मे, २०२१ : एटापल्ली तालुक्यातील कोटमीच्या जंगलात झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाले.जखमी पोलिसांवर नागपुरात उपचारया चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरात आणण्यात आले असून, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुकपोलिसांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानाचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,’ अशा शब्दांत कौतुक केले. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून ही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासातील ही उल्लेखनीय कामगिरी ठरेल. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली