शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जाणून घ्या...पिलेल्या शहाळांचे पुढे काय होते ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:02 IST

पांढºया गरापासून बर्फी, लाडू, दूध तर करवंटीचा सरपणासाठी वापर

ठळक मुद्देपाणी वापरून झालेल्या शहाळातून कधी-कधी पांढरे दूध निघते, ते शरीराला आरोग्यदायी मानले जातेकाही ठिकाणी शहाळ वाळवून ते फोडून त्यापासून कोको पीठ बनवले जातेपांढºया गरापासून बर्फी, लाडूही बनवले जातात तर काही कुटुंबे त्यामध्ये साखर घालून मुलांना खायला देताहेत

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कल्पवृक्षाचे फळ म्हणून पाहिल्या जाणाºया शहाळाला सोलापूरकरांनी उन्हाळ्यात सर्वाधिक आरोग्यदायी म्हणून पसंती दिली़ आतील पाणी प्यायल्या, नंतर राहिलेल्या शहाळाचाही सोलापूरकर पुरेपूर वापर करताहेत़ आतील पांढºया गरापासून बर्फी, लाडू आणि कोकम दूध तर हिरव्या करवंटीचा सरपण म्हणून वापर करताहेत. अर्थात फळ एक, फायदे अनेक अशी व्याख्या आता रूढ होतेय.श्रमकरी वर्गाच्या सोलापुरात शहाळाचा वापर बºयापैकी आहे़ आजारी रु ग्णांना शहाळ दिलं जातंय़ शाळा सुटल्यानंतर अनेक पालक मुलांना शहाळाचे पाणी पाजताहेत़ धार्मिक पूजेसाठीही पूर्व भागात ओला हिरवा नारळ वापरला जातोय़ काही संस्था, संघटना आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांना नारळाऐवजी शहाळ देऊन स्वागत करण्याची प्रथा रूढ झाली आहे़ त्यामुळे शहरात शहाळाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातोय.

शहरात काही ठिकाणी या शहाळाचा वापर सरपणासाठी केला जातोय़ तो जळाऊ लाकडाप्रमाणेच कमी किमतीत काही जण विकतात तर काही विके्रते स्वत:साठीच सरपण म्हणून वापरताहेत़ परंतु शहाळाचा कचरा होणे पूर्णत: थांबले आहे़ आरोग्यदायी नारळ आता सोलापूरकरांसाठी बहुगुणी आणि बहुउपयोगी ठरला आहे.

झोपडपट्टीवासीयांसाठी सरपणच - सध्या जळाऊ लाकूड कमी प्रमाणात उपलब्ध आहे़ अनेक ठिकाणच्या आरा गिरण्या संकटात आहेत, तर काही गिरण्या बंद आहेत़ झाडांची कमतरता असल्याने वाळलेल्या झाडांचीही संख्या राहिली नाही़ मिळणाºया जळाऊ लाकडाचे दरदेखील काही दिवसांपूर्वी वाढले आहेत़ यावर सर्वांत चांगला मार्ग म्हणून झोपडपट्टीतील काही लोक पाणी वापरून झालेले शहाळ फ ोडून ते उन्हात वाळायला घातले जाते आहे़ हेच सरपण म्हणून काही लोक विकताहेत़ काही विक्रेते सकाळी कचरा घेऊन जाणाºया घंटागाडीला टाकून दिलेले शहाळ पुरवताहेत़ मोदी, लष्कर, अशोक चौक अशा परिसरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये सर्वसामान्य लोक हे शहाळ आणून सत्तूरने त्याचे तुकडे करून वाळायला घालताहेत़ 

कोको पिठाचे खत - पाणी वापरून झालेल्या शहाळातून कधी-कधी पांढरे दूध निघते़ ते शरीराला आरोग्यदायी मानले जाते़ त्याच्या कात्यापासून दोरी बनवली जाते़ याशिवाय काही ठिकाणी शहाळ वाळवून ते फोडून त्यापासून कोको पीठ बनवले जाते़ हे पीठ अर्थात सर्वच पिकांसाठी खत म्हणून शेतात वापरले जाते़ याशिवाय पांढºया गरापासून बर्फी, लाडूही बनवले जातात तर काही कुटुंबे त्यामध्ये साखर घालून मुलांना खायला देताहेत़ 

१५ दिवसाला १६ ट्रक...- अख्ख्या महाराष्ट्राला कोकणमधून शहाळ पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी कोकणात तुटवडा निर्माण झाल्याने बंगळुरूमधील मुद्दूर येथून नारळाची आवक झाली. आता मुद्दूर येथील शहाळाची आवक पूर्णत: थांबली आहे, मात्र याच बंगळुरूतील मंड्या येथून आवक सुरू आहे. आताही पूर्वीप्रमाणेच १५ दिवसाला १६ ट्रक शहाळांची आवक आहे. हादेखील तुटवडा मानला जातो. याचा दर मात्र ३५ रुपयांवर स्थिर आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती