शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

जाणून घ्या...पिलेल्या शहाळांचे पुढे काय होते ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:02 IST

पांढºया गरापासून बर्फी, लाडू, दूध तर करवंटीचा सरपणासाठी वापर

ठळक मुद्देपाणी वापरून झालेल्या शहाळातून कधी-कधी पांढरे दूध निघते, ते शरीराला आरोग्यदायी मानले जातेकाही ठिकाणी शहाळ वाळवून ते फोडून त्यापासून कोको पीठ बनवले जातेपांढºया गरापासून बर्फी, लाडूही बनवले जातात तर काही कुटुंबे त्यामध्ये साखर घालून मुलांना खायला देताहेत

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : कल्पवृक्षाचे फळ म्हणून पाहिल्या जाणाºया शहाळाला सोलापूरकरांनी उन्हाळ्यात सर्वाधिक आरोग्यदायी म्हणून पसंती दिली़ आतील पाणी प्यायल्या, नंतर राहिलेल्या शहाळाचाही सोलापूरकर पुरेपूर वापर करताहेत़ आतील पांढºया गरापासून बर्फी, लाडू आणि कोकम दूध तर हिरव्या करवंटीचा सरपण म्हणून वापर करताहेत. अर्थात फळ एक, फायदे अनेक अशी व्याख्या आता रूढ होतेय.श्रमकरी वर्गाच्या सोलापुरात शहाळाचा वापर बºयापैकी आहे़ आजारी रु ग्णांना शहाळ दिलं जातंय़ शाळा सुटल्यानंतर अनेक पालक मुलांना शहाळाचे पाणी पाजताहेत़ धार्मिक पूजेसाठीही पूर्व भागात ओला हिरवा नारळ वापरला जातोय़ काही संस्था, संघटना आपल्या कार्यक्रमात पाहुण्यांना नारळाऐवजी शहाळ देऊन स्वागत करण्याची प्रथा रूढ झाली आहे़ त्यामुळे शहरात शहाळाचा वापर अनेक कारणांसाठी केला जातोय.

शहरात काही ठिकाणी या शहाळाचा वापर सरपणासाठी केला जातोय़ तो जळाऊ लाकडाप्रमाणेच कमी किमतीत काही जण विकतात तर काही विके्रते स्वत:साठीच सरपण म्हणून वापरताहेत़ परंतु शहाळाचा कचरा होणे पूर्णत: थांबले आहे़ आरोग्यदायी नारळ आता सोलापूरकरांसाठी बहुगुणी आणि बहुउपयोगी ठरला आहे.

झोपडपट्टीवासीयांसाठी सरपणच - सध्या जळाऊ लाकूड कमी प्रमाणात उपलब्ध आहे़ अनेक ठिकाणच्या आरा गिरण्या संकटात आहेत, तर काही गिरण्या बंद आहेत़ झाडांची कमतरता असल्याने वाळलेल्या झाडांचीही संख्या राहिली नाही़ मिळणाºया जळाऊ लाकडाचे दरदेखील काही दिवसांपूर्वी वाढले आहेत़ यावर सर्वांत चांगला मार्ग म्हणून झोपडपट्टीतील काही लोक पाणी वापरून झालेले शहाळ फ ोडून ते उन्हात वाळायला घातले जाते आहे़ हेच सरपण म्हणून काही लोक विकताहेत़ काही विक्रेते सकाळी कचरा घेऊन जाणाºया घंटागाडीला टाकून दिलेले शहाळ पुरवताहेत़ मोदी, लष्कर, अशोक चौक अशा परिसरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये सर्वसामान्य लोक हे शहाळ आणून सत्तूरने त्याचे तुकडे करून वाळायला घालताहेत़ 

कोको पिठाचे खत - पाणी वापरून झालेल्या शहाळातून कधी-कधी पांढरे दूध निघते़ ते शरीराला आरोग्यदायी मानले जाते़ त्याच्या कात्यापासून दोरी बनवली जाते़ याशिवाय काही ठिकाणी शहाळ वाळवून ते फोडून त्यापासून कोको पीठ बनवले जाते़ हे पीठ अर्थात सर्वच पिकांसाठी खत म्हणून शेतात वापरले जाते़ याशिवाय पांढºया गरापासून बर्फी, लाडूही बनवले जातात तर काही कुटुंबे त्यामध्ये साखर घालून मुलांना खायला देताहेत़ 

१५ दिवसाला १६ ट्रक...- अख्ख्या महाराष्ट्राला कोकणमधून शहाळ पुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपूर्वी कोकणात तुटवडा निर्माण झाल्याने बंगळुरूमधील मुद्दूर येथून नारळाची आवक झाली. आता मुद्दूर येथील शहाळाची आवक पूर्णत: थांबली आहे, मात्र याच बंगळुरूतील मंड्या येथून आवक सुरू आहे. आताही पूर्वीप्रमाणेच १५ दिवसाला १६ ट्रक शहाळांची आवक आहे. हादेखील तुटवडा मानला जातो. याचा दर मात्र ३५ रुपयांवर स्थिर आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेती