शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पुरंदर उपसा योजनेतून गळती

By admin | Updated: April 8, 2017 01:40 IST

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याचा भुर्दंड मात्र विकत पाणी घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यामुळे ही गळती थांबवण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केली आहे.पुरंदर तालुक्याला दुष्काळ पाचविलाच पुजलेला. चौबाजूंनी डोंगररांगा, पाण्याचे कोणतेही साधन नाही. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा जन्म झाला आणि सारी परिस्थितीच बदलून गेली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्याचप्रमाणे यंदाचा उन्हाळी हंगामातील एक एमसीएफटी पाण्यासाठी शासनाचा ५९,००० हजार रुपये इतका दर आहे. कदाचित, काही दिवसांनी हा दर काही प्रमाणात कमीदेखील होण्याची शक्यता आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजना बारमाही सुरू राहणे गरजेचे आहे. उन्हाळी हंगामात पाण्याची मागणी दर वर्षीच वाढते यामुळे शासकीय यंत्रणेवरती ताण येतो. पुरंदर तालुक्यात दोन्ही हंगामांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. गेल्या वर्षी ३५२ मि.मि. पाऊस झाला, तोही फक्त २२ दिवसच. या पावसात नाले, तळी तर सोडाच, साधे ओढ्यातून पाणीदेखील वाहिले नाही. यामुळे याचा बोजा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर वाढतो व पाण्याची मागणी वाढते. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. उन्हाळी दर जास्त आहे. यामुळे जेवढे पैसे भरले जातात, तेवढे पाणी मिळणे गरजेचे; मात्र या योजनेच्या एअरव्हॉल्व्हची मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही; उलट गळणाऱ्या पाण्याचा भुर्दंड पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर पडतो. यामुळे पाणी घेणारे शेतकरी नाराजी व्यक्त करतात. शाखा अभियंता नाहीपुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले हे मार्च महिनाअखेरीस सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्यापही शाखा अभियंत्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे ही योजना कोण पाहणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गळणारे व्हॉल्व्हचे काय?पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सर्वच व्हॉल्व्ह मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड मात्र लाभार्थी गावातील शेतकऱ्यांना पडतो. यामुळे जास्त दाबाने पाणी मिळत नाही. गळणाऱ्या एअरव्हॉल्व्हचा सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. मात्र, गळणारे एअरव्हॉल्व्ह दुरुस्त होत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करूत आहेत.