शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा योजनेतून गळती

By admin | Updated: April 8, 2017 01:40 IST

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या एअरव्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याचा भुर्दंड मात्र विकत पाणी घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यामुळे ही गळती थांबवण्याची मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी केली आहे.पुरंदर तालुक्याला दुष्काळ पाचविलाच पुजलेला. चौबाजूंनी डोंगररांगा, पाण्याचे कोणतेही साधन नाही. मात्र, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा जन्म झाला आणि सारी परिस्थितीच बदलून गेली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्याचप्रमाणे यंदाचा उन्हाळी हंगामातील एक एमसीएफटी पाण्यासाठी शासनाचा ५९,००० हजार रुपये इतका दर आहे. कदाचित, काही दिवसांनी हा दर काही प्रमाणात कमीदेखील होण्याची शक्यता आहे. पुरंदर उपसा जलसिंचन योजना बारमाही सुरू राहणे गरजेचे आहे. उन्हाळी हंगामात पाण्याची मागणी दर वर्षीच वाढते यामुळे शासकीय यंत्रणेवरती ताण येतो. पुरंदर तालुक्यात दोन्ही हंगामांत सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो. गेल्या वर्षी ३५२ मि.मि. पाऊस झाला, तोही फक्त २२ दिवसच. या पावसात नाले, तळी तर सोडाच, साधे ओढ्यातून पाणीदेखील वाहिले नाही. यामुळे याचा बोजा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेवर वाढतो व पाण्याची मागणी वाढते. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. उन्हाळी दर जास्त आहे. यामुळे जेवढे पैसे भरले जातात, तेवढे पाणी मिळणे गरजेचे; मात्र या योजनेच्या एअरव्हॉल्व्हची मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही; उलट गळणाऱ्या पाण्याचा भुर्दंड पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर पडतो. यामुळे पाणी घेणारे शेतकरी नाराजी व्यक्त करतात. शाखा अभियंता नाहीपुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले हे मार्च महिनाअखेरीस सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी अद्यापही शाखा अभियंत्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. यामुळे ही योजना कोण पाहणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.गळणारे व्हॉल्व्हचे काय?पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सर्वच व्हॉल्व्ह मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड मात्र लाभार्थी गावातील शेतकऱ्यांना पडतो. यामुळे जास्त दाबाने पाणी मिळत नाही. गळणाऱ्या एअरव्हॉल्व्हचा सर्व्हेदेखील करण्यात आला आहे. मात्र, गळणारे एअरव्हॉल्व्ह दुरुस्त होत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करूत आहेत.