शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

नेतृत्व, राजकारण, प्रशासनाचाही धडा गिरवता येणार!

By admin | Updated: June 1, 2017 03:49 IST

समाजात नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. पण, ‘नेतृत्वशास्त्र’ हा विषय अभ्यासक्रमात शिकवला जात नाही. मॅनेजमेंट अभ्यासक्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समाजात नेतृत्वगुणांना  महत्त्व आहे. पण, ‘नेतृत्वशास्त्र’ हा विषय अभ्यासक्रमात शिकवला जात नाही. मॅनेजमेंट अभ्यासक्रमात शिकवले जाणारे नेतृत्व हे फक्त मर्यादित स्वरूपाचे असते. त्यामुळे राजकारण, प्रशासन आणि नेतृत्व यांचा एकत्रित अभ्यासक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या पुढाकाराने इंडियन इन्स्टिट्यूट  आॅफ डेमोक्रॅटिक लीडरशिपतर्फे  १ आॅगस्टपासून सुरू करण्यात  येणार आहे. या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा बुधवारी इंडियन मर्चंट चेंबर्स येथे करण्यात आली.  या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे,  लेखक अमीष त्रिपाठी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, रामभाऊ म्हाळगी  प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक  रवींद्र साठे आणि प्रा. देवेंद्र पै उपस्थित होते. या कार्यक्रमात अभ्यासक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि घडीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. १ आॅगस्टपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार असून, ९ महिन्यांचा  आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले, राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. पण, या अभ्यासक्रमांमध्ये पुस्तकी ज्ञान अधिक मिळते. प्रात्यक्षिक ज्ञान मिळत नाही. चांगले प्रशासन ही संज्ञा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वापरली जाते. पण, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळेच राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या अथवा प्रशासनाचे ज्ञान असावे म्हणून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.  मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. संजय देशमुख यांनी अभ्यासक्रमाचे कौतुक केले. सक्षम नेतृत्व निर्माण करण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण होईल. त्याचबरोबर आता मुंबई विद्यापीठातही २३ वर्षांनी निवडणुका होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमाचा नक्कीच समाजाला फायदा होणार आहे. लेखक त्रिपाठी म्हणाले, प्राचीन काळात भारताची अर्थव्यवस्था, संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जात  होती. प्रत्येक क्षेत्रात देश अव्वल  होता. पण, गेल्या २०० ते ३००  वर्षांत देशाचे नाव मागे पडत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना विसरलो आहोत. इंग्रजांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीचा आपल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडल्यामुळेच  आधीचे ज्ञान विस्मरणात गेले  आहे. पण, आता नव्याने सुरू  होणाऱ्या या अभ्यासक्रमामुळे नक्कीच त्याचा फायदा तरुण पिढीसह समाजालाही होणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओद्वारे दिल्या शुभेच्छा!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; पण उपस्थित राहू न शकल्याने व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या. लोकशाहीत नेतृत्वगुणाला महत्त्व आहे.राजकारण असेही बदनाम आहे. अनेकदा या विषयावर नकारात्मक बोलले जाते. राजकारणी हे चलाखीने बोलतात; पण त्यांना ज्ञान नसते, असा समज करून घेतला आहे; पण आता शैक्षणिक अर्हता पाहिली जाईल. अनेकदा आयएएसनाही काही गोष्टी माहीत नसतात.त्यामुळे चौकटीबरोबर शासनाचे अंतर्बाह्य ज्ञान मिळेल. पाठ्यक्रम आणि सिद्धान्तांचा अभ्यास होईल. प्रात्यक्षिक ज्ञानाचा नक्कीच फायदा होणार आहे. सुजाण नागरिक निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.