शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष समितीच्या नेत्याला ‘मातोश्री’वर धमकावले , नारायण राणे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 05:10 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले

मुंबई : ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणातील शिवसेना नेते जमिनी संपादित करण्यासाठी लोकांवर दबाव आणत असून, संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी धमकावले, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद देला. कोकणी माणसांच्या वाटेला जाल तर फटके देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.कोकणात होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने आणला आहे. त्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे दाद का मागत नाही? असा सवाल केला असता राणे म्हणाले, आपण मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. त्यांना भेटून प्रकल्प रद्द करण्याची मागणी करणार आहे, पण उद्योगमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यांनी या प्रकल्पाला होकार का कळविला? खा. विनायक राऊत, राजन साळवी या शिवसेना नेत्यांनी व दलालांनी कोकणात शेतकºयांना धमक्या देऊन जमिनी खरेदी करणे सुरू केले आहे, असा आरोप राणेंनी केला.ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील फळबागांचे आणि माशांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे कोकणी माणूस देशोधडीला लागण्याची भीती आहे. प्रकल्पाच्या परिसरात काही अधिकाºयांनी २०० एकर जमिनी घेतल्या आहेत. पोलीस अधिकारी दमदाटी करत आहेत, याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत, असेही राणे यांनी सांगितले.वडिलांना माफी मागायला लावलीमातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला प्रकल्पाला विरोध करू नका, आमच्या नेत्यांविरुद्ध काही बोलू नका, असे सांगून माझ्या वडिलांना माफी मागायला लावली, असा आरोप विनेश वालम यांनी याच पत्रकार परिषदेत केला. माझ्या वडिलांना कोकणातील एका खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, तेथे एका अनोळखी डॉक्टराने त्यांना बळजबरीने इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. कशाचे इंजेक्शन आहे? असे विचारले असता, इंजेक्शन फेकून ते पळून गेले, असा आरोप वालम यांनी केला.सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यामाझी सहनशीलता संपण्याच्या आत मंत्रिपदाबाबत जो काय निर्णय घ्यायचा तो घ्या, असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगणार आहोत, असे राणे यांनी सांगितले. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्याप त्या दृष्टीने काहीच हालचाल होताना दिसत नाही. हिवाळी अधिवेशनाच्या आधी त्यांचा समावेश केला जाईल, असे सांगितले गेले. आता डिसेंबरअखेरची तारीख निघाल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे