शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

सामाजिक बहिष्काराला पायबंद घालणारा कायदा

By admin | Updated: March 12, 2015 06:03 IST

रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात सामाजिक बहिष्कार टाकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे

मुंबई : रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागात सामाजिक बहिष्कार टाकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे किंवा त्यावर बहिष्कार टाकण्याच्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी येत्या तीन महिन्यांत कायदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.समाजातील प्रथा परंपरा मोडीत काढल्यामुळे जातपंचायतींच्या माध्यमातून लोकांचा छळ होतो. काही प्रकरणांत तर एखादे कुटुंब किंवा कुटुंबातील व्यक्तीस वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सामाजिक बहिष्कार मागे घेण्यासाठी पैसा उकळला जातो, असा आरोप या सदस्यांनी केला. बहिष्कार टाकणाऱ्यांवर आणि बहिष्कार मागे घेण्यासाठी पैसा उकळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यात सामाजिक बहिष्काराचे ३४ गुन्हे दाखल झाले, त्यातील २८ प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट केले. अशा वाढत्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांना जरब बसेल असा ठोस तरतुदी असलेला कायदा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यात ठोस तरतुदी असतील. जालना येथे घडलेल्या एका प्रकारात न्यायालयाने १० जणांवर दोषारोपपत्र ठेवले आहे. तर ३१ जणांच्या विरोधात याच प्रकरणात गुन्हा दाखल झाला. रायगड जिल्ह्णात एकाच गोत्राचे असूनही लग्न केल्यामुळे दोन कुटुंबाना वाळीत टाकण्याची घटना घडली. त्यांच्याकडून जात पंचायतीने एक लाख ४५ हजार रु पये उकळले या प्रकरणी ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)