शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

बेभान चालकांना कायद्याचा चाप

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे.

मुंबई : गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे, दारू पिऊन गाडी चालविणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहून नेणे यापुढे चांगलेच महागात पडणार आहे. अशा कृती करणाऱ्या बेदरकार वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज ही माहिती दिली. दारू पिऊन वा अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालविणाऱ्यांचे लायसन्स तर रद्द केले जाईलच; पण त्यांच्यावरील खटला न्यायालयात चालेल तेव्हा त्यांना कैदेचीच शिक्षा करावी, अशी ठाम भूमिका सरकारच्या वतीने मांडली जाईल, असे रावते यांनी पत्रपरिषदेत सांगितले. या नव्या नियमांची तातडीने अंमलबजावणी करण्यास राज्य सरकार उत्सुक आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे दुचाकीचालकांना हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. या आदेशाची तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावण्याच्या आदेशाचीही राज्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. हेल्मेट न घालणारे वा सीटबेल्ट न लावणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन करण्यात येईल आणि हे समुपदेशन अनिवार्य असेल, असे रावते यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)नजर सीसीटीव्हीची मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर असेल. सीसीटीव्ही नेटवर्कमुळे गाड्यांचा क्रमांक टिपला जाईल आणि आरटीओतून त्या गाडीच्या मालकाचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. वाहनांच्या नंबर प्लेटना आरएफआयडी यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. ही यंत्रणा बसविल्यानंतर त्या वाहनाबाबतची संपूर्ण माहिती तत्काळ मिळू शकेल, असे रावते म्हणाले.रिक्षा परवान्यांचे फेरवाटपराज्यात ६० हजार आॅटोरिक्षा परवान्यांचे फेरवाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आॅनलाइन पद्धतीने लॉटरी प्रक्रिया राबवून हे परवाने दिले जात आहेत. त्यातील ५ टक्के परवाने हे महिलांसाठी आरक्षित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. हे परवाने घेणाऱ्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत ७0५ तळीराम अडकले जाळ्यातमुंबई - नववर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या तळीराम चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यात ७0५ तळीराम चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. मुंबईत ९0 ठिकाणी नाकाबंदीसाठी २५0 अधिकारी आणि २,५00 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ७0५ तळीराम चालकांना पकडून प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची कारवाई केल्याचे वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले. उत्तर आणि पूर्व मुंबईत सर्वाधिक कारवाई झाली. मागील वर्षी ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यात ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता.विनाहेल्मेट सुसाटदारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करताना विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली. १ हजार ९0६ दुचाकीस्वारांना पकडण्यात आले. त्याचप्रमाणे १ हजार १३५ नो पार्किंग करणाऱ्या आणि ५९ बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.