शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

मऱ्हाटमोळ्या लावणीचा बाज, अदाकारी हरवली

By admin | Updated: April 28, 2015 00:33 IST

लीला गांधी यांची खंत : हिंदीचे अनुकरण मराठीत

संतोष मिठारी - कोल्हापूर -गाण्यांचा अर्थ अदाकारीतून पेश करत त्याला लक्षवेधक नृत्याची जोड देण्याची कला म्हणजे लावणी आहे. तिला एक अस्सल मराठमोळा बाज होता. मात्र, प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरूचीमुळे मऱ्हाटमोळ्या लावणीचा बाज, अदाकारी आता हरवल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी सोमवारी व्यक्त केली. मराठी चित्रपटांमध्ये हिंदीचे वाढलेले अनुकरण हे वेगळंपण जपलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला मारक ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.भगिनी पुरस्कार सोहळ््यासाठी कोल्हापुरात त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेत्री गांधी म्हणाल्या, लावणीमध्ये नृत्य आणि गाण्यांचा अर्थ सांगणारे चेहऱ्यावरील हावभाव आणि अदाकारीला महत्त्व आहे. या दोन गोष्टींचा उत्तम संगम म्हणजे लावणी आहे. त्याच्या जोरावरच लावणी अस्सल मराठमोळ्या बाजारात सादर होत होती. मात्र, सध्या लावणीतील शब्द कुठे जात आहेत ते समजत नाहीत. त्यातील अर्थाची जागा धांगडधिंगाण्याने घेतली आहे. चेहऱ्यावरील हावभाव बदलले असून अदाकारी गायब झाली आहे. प्रेक्षकांची बदललेली अभिरूची त्याला कारणीभूत आहे. बदलत्या जगानुसार लावणी बदलत आहे. त्यात अदाकारी, बाज असलेली लावणी लोप पावत आहे. या लावणीची आवड प्रेक्षकांमध्ये रुजविण्यासाठी गाण्यांच्या शब्दांवर नृत्य, अदाकारी सादर करणे गरजेचे आहे. चित्रपट, लावणीमधील येणाऱ्या नव्या मुलींचे नृत्य कौशल्य चांगले आहे. पण, त्याला शास्त्रीय पाया नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. मराठी चित्रपटांमधील बदलांबाबत त्या म्हणाल्या, पूर्वी पैसे कमी असल्याने मराठीत कसे-बसे दोन-चार चित्रपट व्हायचे. आता परिस्थिती बदलली असून चित्रपटांची संख्या वाढली आहे; पण त्यात हिंदीचे अनुकरण होत आहे. कपडे, भूमिका, अभिनयातील ‘बोल्डनेस’ यामुळे हिंदीचे अनुकरण खटकणारे आहे. त्यामुळे चित्रपट धडाधड येत असले, तरी ते त्याहून अधिक वेगाने विस्मृतीत देखील जात आहेत. सातासमुद्रापार जाऊन उपयोग काय ?आता काही नृत्यांगणा सातासमुद्रापार असलेल्या अमेरिका, आदी देशांत लावणीचे धडे देण्यासाठी जात आहेत. ते चांगले आहे. पण, लावणीचे धडे देणाऱ्यांना नेमकी लावणी माहीत नाही. चित्रपटांतील गीतांचा समावेश, पेहराव्यातील बदलाने लावणीचा मूळ बाज गायब झाला आहे. अशा स्वरूपातील लावणी सातासमुद्रापार जाऊन उपयोग काय ?, असा सवाल ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी उपस्थित केला.अनंत माने यांच्या नावाने पुरस्कार द्यावाख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने मराठी चित्रपटसृष्टीला यांनी भरभरून दिले. ते कोल्हापूरचे भूषण होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अशोककुमार यांच्यासमवेतचा आशीर्वाद, महिपालबरोबरचा ‘बगदाद की राते’, हेलनसोबतचा ‘बस कंडक्टर’ या हिंदी चित्रपटांत मी काम केले. पण, ते फारसे रूचले नाही. मराठीतील ‘रेशमाच्या गाठी’साठी आॅडिशन देण्यासाठी गेले असताना अनंत माने यांनी नृत्यकौशल्य पाहून ‘प्रीतीसंगम’मधून संधी दिली. हा माझा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर माने यांच्या सर्व चित्रपटांमध्ये मी होते. ‘सांगत्ये ऐका’ने वेगळी ओळख दिली. ‘केला इशारा जाता जाता...’ मध्ये त्यांनी मुख्य भूमिका मला दिली. ते भूमिकेचा पाया सांगायचे. अनेकदा ते स्वत: एखादे दृश्य करून दाखवायचे. प्रत्येक प्रसंग अंत:करणातून आणि हुबेहूब होण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. ते माझे गुरू होते. दिग्दर्शकांसह त्यांना गायन, अभिनयाचे चांगले अंग होते. अभिनय, गीत आणि कथा अशा सर्वच पातळीवरील उत्तम चित्रपट हा अनंत माने यांची खासीयत होती. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी आपली हयात घालविली. शांताराम बापूंपाठोपाठ त्यांचे कार्य आहे. जन्मशताब्दी वर्षात त्यांचे कोल्हापुरात स्मारक व्हावे. त्यासाठी यशाशक्ती मदत मी करेन.