शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

लातूरची तूरडाळ ऑस्ट्रेलिया, कॅनडा अन् दुबईत! कोट्यवधींची उलाढाल, दर ८ हजारांपर्यंत जातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 07:43 IST

लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात.

हरी मोकाशे   लातूर : गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे महाराष्ट्रातील डाळींचा लौकिक आधी दक्षिण भारतात आणि आता परदेशातही झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दुबई अन् अमेरिकेतही मागणी वाढली आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक अन् तेलंगणाच्या सीमाभागातून आलेल्या तुरीद्वारे लातूरच्या १५० कारखान्यांमध्ये दररोज एकूण ३ हजार १५० टन डाळीची निर्मिती होत आहे.  

लातूर, नांदेडसह विदर्भ, कर्नाटक व तेलंगणाच्या सीमाभागातील शेतकरी तूर विक्रीसाठी लातूरची बाजारपेठ निवडतात. बाजार समितीत शेतमालाचा वेळेवर मापतोल व शेतकऱ्यांना लगेच पट्टी मिळते. येथे तूरडाळ निर्मितीचे प्रकल्पही दीडशेवर गेले असून, ही संख्या मराठवाड्यात सर्वाधिक आहे. 

शेतकऱ्यांना किती मिळेल भाव?सहा महिन्यांपूर्वी तुरीने उच्चांकी भाव गाठल्याने शेतकऱ्यांनी तूर उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने आवकही वाढली. परिणामी, दर उतरले असून, सध्या ६ हजार ८०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे दर ८ हजारांपर्यंत पोहोचतील, असा डाळ उद्योजकांचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या तूरडाळीमध्ये लातूर ब्रॅण्ड जगभर जात आहे. १५० कारखान्यांमधून २० हजार जणांना रोजगार मिळतो. तुरीचे दर कमी-जास्त झाले तरी लातूरच्या डाळीची गुणवत्ता कायम आहे. त्यामुळे इथल्या डाळीला दक्षिण भारतात सर्वाधिक मागणी आहे. देशातील मोठे व्यापारी हीच डाळ पॅकेजिंग करून निर्यात करीत आहेत. - नितीन कलंत्री, डाळ उद्योजक