शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

दुष्काळग्रस्त लातूरमध्ये मुलाने वडिलांना आत्महत्या करण्यापासून रोखलं

By admin | Updated: April 25, 2016 13:09 IST

अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे

ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 25 – अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे. धनराज शिंदे असं या शेतक-याचं नाव आहे. लातूरच्या शिरपूर अनंतपाल गावातील ही घटना आहे.
 
धनराज शिंदे नेहमीप्रमाणे शेतात चालले होते. मात्र त्यांनी आपली सामानाची बॅग, फोन काहीच घेतलं नसल्याचं त्यांचा 14 वर्षीय मुलगा पृथ्वीराजच्या लक्षात आलं, आणि लगेच त्याने वडिलांना रोखलं. 'मी त्यांना दोर गुंडाळताना पाहिलं होतं. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तुमच्यानंतर आमची काळजी घेण्यासाठी कुणीच नसेल', असं पृथ्वीराजने वडिलांना सांगितलं. त्यानंतर भावनिक झालेल्या धनराज शिंदे यांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला.
धनराज शिंदे यांची तीन एकर जमीन आहे. सलग 3 वर्ष शेतीतून काहीच उत्पन्न मिळालेलं नाही. पहिल्या वर्षी गारपीटीमुळे शेतीचं नुकसान झालं. आणि त्यानंतर सलग दोन वर्ष दुष्काळामुळे काहीच शेती झाली नाही. धनराज शिंदे यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत. त्यांच्यावर 15 लाखांच कर्ज आहे तरीही त्यांनी आपला लढा सुरु ठेवला होता. वायरलेस ऑपरेटरसाठी त्यांच्या मुलीला नोकरी मिळाली आहे. पण स्थानिक शासकीय कर्मचारी दिरंगाई करत असल्याने त्यांचा तणाव वाढला होता.
'माझ्या मुलांची खुप स्वप्ने आहेत. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे. जर निसर्गाने साथ दिली नाही तर त्यांच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकणार नाही', अशी भीती धनराज शिंदे व्यक्त करत आहेत. त्यांच्या 26 वर्षीय अर्चना या मुलीला संस्कृतमध्ये राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराजला आयएएस अधिकारी बनायचं आहे.
 
'माझ्या मुलाने आत्महत्या करण्यापासून रोखलं नसतं तर काय झालं असत ? माझं कर्ज फेडण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. माझ्या मुलांच्या अपेक्षा पुर्ण करणं हे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी एक आव्हान आहे', असं धनराज शिंदे बोलले आहेत