शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अखेरच्या प्रवासासाठीदेखील ‘आधार कार्ड’चा पुरावा दाखवावा लागणार

By sanjay.pathak | Updated: October 3, 2017 21:49 IST

 नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने आधार कार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधार ...

ठळक मुद्दे मृत व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही, असे सांगण्यात येते. शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्येही सक्तीचे केले आहे.

 नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.केंद्र सरकारने आधार कार्ड योजना आणून अनेक वर्षे झाली तरी अद्यापही बहुतांशी नागरिकांकडे आधार कार्ड नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना बायोमेट्रिक म्हणजेच बोटाच्या ठशांची जुळणी होत नसल्याच्या किंवा अन्य तक्रारी आहेत. दुसरीकडे शासनाने सर्वच शासकीय योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहेच, शिवाय अमरधाममध्येही सक्तीचे केले आहे. मृत व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असून, ते कार्ड नसेल तर मृत्यूचा दाखला मिळणार नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहेत. नाशिक महापालिकेच्या अमरधाममध्येही आधार कार्ड सक्तीचे असून ती माहिती न मिळाल्यास अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात, कॉँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी या आडमुठेपणामुळे मृत व्यक्तीला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत, असे सांगितले. आधार कार्ड नसल्याने कोठेही अंत्यसंस्कार करण्यास अडथळे आले नसले तरी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात असलेल्या कुटुंबीयांनी आधार कार्ड शोधत आणायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने अमरधामध्ये मृत व्यक्तीची माहिती भरून घेण्याच्या अर्जात मृत व्यक्ती दारू किंवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे सेवन करीत होते काय, असल्यास किती वर्षे, अशाप्रकारची माहिती भरून घेतली जाते. त्याचबरोबर याच अर्जात सुपारी, सिगारेट, विडी किंवा पान मसाल्याचे व्यसन होते काय आणि किती वर्षांपासून यांसारखे मृत व्यक्तीसंदर्भात प्रश्न देण्यात आले आहेत. सरकारने २०१२ पासूनच ही माहिती आवश्यक केल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारे प्रश्न मृत्यूनंतर विचारून काय साध्य होणार असा प्रश्न केला जात आहे. त्यात आता आधार कार्डाची सक्तीही डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे.