शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

जालन्यात अखेरच्या दिवशी फिरली हवा, पण कुणाच्या बाजुने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 09:40 IST

भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई - जालना मतदार संघातील लढत महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची मानली जाते. गेल्यावेळी विजयी उमेदवार शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांच्यातील विजयाचे अंतर 300 मतांच्या आत होते. आता देखील ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी येथील हवा फिरल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर एकमेकांना आव्हान देत आहेत. यावेळीही अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी प्रचारात जोर लावला. येथील नगर परिषद गोरंट्याल यांच्याकडे आहे. तर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे.

2014 मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवसेना आणि भाजप यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र कैलाश गोरंट्याल दुसऱ्या स्थानी होते. तर राष्ट्रवादीची फारशी ताकत नव्हती. अवघ्या 250 मतांनी खोतकर विजयी झाले होते. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली. त्यामुळे खोतकर यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात येत होते. तसं चित्रही प्रचारात दिसून येत होते.

दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी गोरंट्याल यांनी प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत आघाडी घेतली. काँग्रेसची लहर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.