शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जालन्यात अखेरच्या दिवशी फिरली हवा, पण कुणाच्या बाजुने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 09:40 IST

भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई - जालना मतदार संघातील लढत महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची मानली जाते. गेल्यावेळी विजयी उमेदवार शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांच्यातील विजयाचे अंतर 300 मतांच्या आत होते. आता देखील ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी येथील हवा फिरल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर एकमेकांना आव्हान देत आहेत. यावेळीही अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी प्रचारात जोर लावला. येथील नगर परिषद गोरंट्याल यांच्याकडे आहे. तर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे.

2014 मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवसेना आणि भाजप यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र कैलाश गोरंट्याल दुसऱ्या स्थानी होते. तर राष्ट्रवादीची फारशी ताकत नव्हती. अवघ्या 250 मतांनी खोतकर विजयी झाले होते. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली. त्यामुळे खोतकर यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात येत होते. तसं चित्रही प्रचारात दिसून येत होते.

दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी गोरंट्याल यांनी प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत आघाडी घेतली. काँग्रेसची लहर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.