शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात अखेरच्या दिवशी फिरली हवा, पण कुणाच्या बाजुने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 09:40 IST

भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई - जालना मतदार संघातील लढत महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची मानली जाते. गेल्यावेळी विजयी उमेदवार शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांच्यातील विजयाचे अंतर 300 मतांच्या आत होते. आता देखील ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी येथील हवा फिरल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.

जालन्यात गेल्या अनेक वर्षांपासून कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर एकमेकांना आव्हान देत आहेत. यावेळीही अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी प्रचारात जोर लावला. येथील नगर परिषद गोरंट्याल यांच्याकडे आहे. तर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे.

2014 मध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवसेना आणि भाजप यांनी लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र कैलाश गोरंट्याल दुसऱ्या स्थानी होते. तर राष्ट्रवादीची फारशी ताकत नव्हती. अवघ्या 250 मतांनी खोतकर विजयी झाले होते. यावेळी भाजप-शिवसेना युती झाली. त्यामुळे खोतकर यांचा मार्ग सुकर झाल्याचे सांगण्यात येत होते. तसं चित्रही प्रचारात दिसून येत होते.

दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी गोरंट्याल यांनी प्रचाराच्या अखेरच्या काही दिवसांत आघाडी घेतली. काँग्रेसची लहर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यात त्यांना काही प्रमाणात यशही आले. भाजप-शिवसेना युतीमुळे गोरंट्याल यांचा निभाव लागणे तितकेसे सोपे नाही. मात्र, मतदार संघात गोरंट्याल यांच्या बाजुने हवा फिरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोण विजयी होणार हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरचीच वाट पाहावी लागणार आहे.