शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

१६ वर्षांत ११२ पर्यटकांना जलसमाधी

By admin | Updated: February 2, 2016 04:08 IST

पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

आविष्कार देसाई,  अलिबाग पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुरूड, काशिद, राजपुरी समुद्रकिनारी २००० ते २०१६ या कालावधीत सुमारे ८४ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर अलिबाग तालुक्यात २८ जणांना जीव गमावावा लागला आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुरूडला भेट दिली. नगर परिषदेने धोक्याचे बोर्ड लावणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. अलिबाग मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. सहलीसाठी तिथे जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे विशेष आकर्षण असते, मात्र भरती-ओहोटी आणि समुद्राच्या रौद्रतेची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे दुर्घटना घडतात.नांदगाव : मुले बुडाल्याची माहिती कळताच मुरूड शहरातील हिंदू-मुस्लीम लोक बहुसंख्येने समुद्रकिनारी आले. ज्यांना वाचवण्यात आले त्यांना तातडीने दुचाकीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले. स्थानिक टांगेवालेसुद्धा मदतीला येऊन त्यांनी सर्व रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. तातडीने १०८ या अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणी आढळलेले विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केला गेला. केवळ १०८ची मदत न घेता मुरूड व्यापारी बँकेच्या अ‍ॅम्ब्युलन्स गाडीचीही मदत घेण्यात आली. सर्व लोक मदतीसाठी धावत होते. (वार्ताहर)पुणे : महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांनी सुचविलेल्या ठिकाणीच समुद्रकिनाऱ्यावर जावे, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दु:खद घटना घडली. त्यातही समुद्रकिनारी जीवरक्षक असते तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी सांगितले.समुद्रातील उंच सखल भागातील पाण्यात मुले गेल्याने ही घटना घडली. महाविद्यालयाकडून अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते की इतर कोणत्या सहलीचे यासंदर्भातील माहिती महाविद्यालाकडून घेतली जाईल, अशी माहिती पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेड यांनी दिली.मुरूड समुद्रकिनारी गेल्या सहा महिन्यांत दुसरी दुर्घटना घडली आहे. आॅगस्ट २०१५ रोजी चेंबूर, घाटला परिसरातील काही व्यावसायिक पर्यटनासाठी आले असता त्यापैकी सहा जणांना जलसमाधी मिळाली होती. मुरूड येथील पार्वती लॉजमागील समुद्रकिनारी धोक्याच्या ठिकाणी, जिथे भोवरा तयार होतो तिथेच हे व्यावसायिक पोहण्यासाठी गेले होते. त्यात सहा जणांनी जीव गमावला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण होतात तोच पुणे कॅम्प येथील अबिदा इनामदार सीनिअर कॉलेजचे विद्यार्थी मुरूडच्या किनाऱ्यावर बुडून मृत्युमुखी पडले. स्थानिक टांगेवाल्यांनी त्यांना अडवले होते, मात्र त्यांचे न ऐकता ते समुद्रात उतरले. अवघ्या ३५ मिनिटांत ते बुडाले. नगर परिषदेने अद्याप पर्यटकांसाठी कायमस्वरूपी जीवरक्षक नेमलेले नाहीत. धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. (वार्ताहर)