शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
5
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
6
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
7
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
8
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
9
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
10
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
11
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
12
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
13
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
14
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
15
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
16
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
17
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
18
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
19
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
20
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले

१६ वर्षांत ११२ पर्यटकांना जलसमाधी

By admin | Updated: February 2, 2016 04:08 IST

पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

आविष्कार देसाई,  अलिबाग पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मुरूड, काशिद, राजपुरी समुद्रकिनारी २००० ते २०१६ या कालावधीत सुमारे ८४ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर अलिबाग तालुक्यात २८ जणांना जीव गमावावा लागला आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुरूडला भेट दिली. नगर परिषदेने धोक्याचे बोर्ड लावणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. अलिबाग मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. सहलीसाठी तिथे जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे असते. पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांचे विशेष आकर्षण असते, मात्र भरती-ओहोटी आणि समुद्राच्या रौद्रतेची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे दुर्घटना घडतात.नांदगाव : मुले बुडाल्याची माहिती कळताच मुरूड शहरातील हिंदू-मुस्लीम लोक बहुसंख्येने समुद्रकिनारी आले. ज्यांना वाचवण्यात आले त्यांना तातडीने दुचाकीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले. स्थानिक टांगेवालेसुद्धा मदतीला येऊन त्यांनी सर्व रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. तातडीने १०८ या अ‍ॅम्ब्युलन्सला पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणी आढळलेले विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केला गेला. केवळ १०८ची मदत न घेता मुरूड व्यापारी बँकेच्या अ‍ॅम्ब्युलन्स गाडीचीही मदत घेण्यात आली. सर्व लोक मदतीसाठी धावत होते. (वार्ताहर)पुणे : महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सहलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी स्थानिक नागरिकांनी सुचविलेल्या ठिकाणीच समुद्रकिनाऱ्यावर जावे, महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, काही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दु:खद घटना घडली. त्यातही समुद्रकिनारी जीवरक्षक असते तर विद्यार्थ्यांचा जीव वाचला असता, असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार यांनी सांगितले.समुद्रातील उंच सखल भागातील पाण्यात मुले गेल्याने ही घटना घडली. महाविद्यालयाकडून अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते की इतर कोणत्या सहलीचे यासंदर्भातील माहिती महाविद्यालाकडून घेतली जाईल, अशी माहिती पुणे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. विजय नारखेड यांनी दिली.मुरूड समुद्रकिनारी गेल्या सहा महिन्यांत दुसरी दुर्घटना घडली आहे. आॅगस्ट २०१५ रोजी चेंबूर, घाटला परिसरातील काही व्यावसायिक पर्यटनासाठी आले असता त्यापैकी सहा जणांना जलसमाधी मिळाली होती. मुरूड येथील पार्वती लॉजमागील समुद्रकिनारी धोक्याच्या ठिकाणी, जिथे भोवरा तयार होतो तिथेच हे व्यावसायिक पोहण्यासाठी गेले होते. त्यात सहा जणांनी जीव गमावला होता. या घटनेला सहा महिने पूर्ण होतात तोच पुणे कॅम्प येथील अबिदा इनामदार सीनिअर कॉलेजचे विद्यार्थी मुरूडच्या किनाऱ्यावर बुडून मृत्युमुखी पडले. स्थानिक टांगेवाल्यांनी त्यांना अडवले होते, मात्र त्यांचे न ऐकता ते समुद्रात उतरले. अवघ्या ३५ मिनिटांत ते बुडाले. नगर परिषदेने अद्याप पर्यटकांसाठी कायमस्वरूपी जीवरक्षक नेमलेले नाहीत. धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. (वार्ताहर)