शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यभरातील गावठाणांचे भूमापन ३३ ड्रोनच्या सहाय्याने!; मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:44 IST

भूमापनाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

पुणे: राज्यातील तब्बल चाळीस हजार गावठाणांच्या भूमापनाचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमिअभिलेख विभागाने ठेवले असून त्यासाठी सुमारे ३३ ड्रोनचा वापर केला जाणार आहे. सर्व्हे आॅफ इंडियाच्या मदतीने भूमापनाचे काम करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ड्रोन पथक या पद्धतीने भूमापनाचे काम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे.अनेक वर्षांपासून सुमारे ४० हजार गांवाच्या गावठाणाचे भूमापन रखडले होते. कमी कालावधीत व जलद गतीने गावठाणाच्या भूमापनाचे काम ड्रोनच्या सहाय्याने होणार असल्याने त्यास राज्यमंत्री मंडळाने मंजूरी दिली. त्यासाठी सुमारे २७० कोटी रुपये खर्च येणार असून देशात या पद्धतीने प्रथमच मोजणी केली जाणार आहे.राज्यातील ४३ हजार ६६४ गावांमध्ये ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून अधिकार अभिलेख ७/१२ उतारा उपलब्ध आहे. तर गावठाणातील घरांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून गावठाणातील भूमापन करून नकाशा व मिळकत पत्रिका दिली जाते. मात्र, महसूल विभागाकडील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आत्तापर्यंत राज्यातील केवळ ३ हजार ९३१ गावांच्या गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३९ हजार ७३३ गावांचे गावठाणाचे भूमापन करून प्रत्येक जागा धारकास नकाशे व मिळकत पत्रिका तयार करणे सध्याच्या मनुष्यबळाच्या व जुन्या पद्धतीनुसार केवळ अशक्य होते. त्यामुळे त्यानंतर त्वरीतच भूमिअभिलेख विभागाने पुढील तयारी सुरू केली आहे.राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख एस.चोक्कलिंगम म्हणाले, ड्रोनव्दारे प्रत्यक्षात मोजणी करण्यापूर्वी सर्व्हे आॅफ इंडियाच्यावतीने मोजणी करण्यात येणाºया गावामध्ये जीपीएस यंत्रणा अधिक कार्यक्षमपणे चालावी यासाठी एक स्टेशन उभारले जाईल. संबंधित जागेच्या मोजणीसाठी पांढºया चुन्याने आऊट लाईन मारला जातील. त्यानंतर ड्रोनव्दारे फोटोे काढून मोजणीचे प्रक्रिया पूर्ण केले जाईल.ड्रोनच्या मदतीने केल्या जाणाºया मोजणीसाठी राज्य शासनाने सुमारे २७१ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील तीन वर्षात मोजणीचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर शासनाकडून घेतलेला निधी परत केला जाणार आहे. नागरिकांना दिल्या जाणाºया सनदेसाठी केवळ तीनशे ते एक हजार रूपये आकारले जाणार आहेत. जमिनीच्या मालकीचे कागदपत्र मिळणार असल्याने नागरिकांना त्याचा विविध कारणांसाठी वापर करता येऊ शकतो. पुढील तीस वर्षात न होऊ शकणारी बाब ड्रोनच्या भूमापन पद्धतीमुळे ३ वर्षात पूर्ण होणार आहे.- एस. चोक्कलिंगम, जमाबंदी आयुक्त,संचालक भूमिअभिलेख, महाराष्ट्र राज्यड्रोनच्या माध्यमातून केल्या जाणाºया मोजणीनंतरनागरिकांना सनद मिळणारआहे. यामुळे ग्रामीणभागातील जमीनींना चांगलेभाव येणार आहेत.त्याचप्रमाणे गावठाणाच्याजागेत होणारे अतिक्रमणकाढणे शक्यहोणार आहे.