शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहा महिन्यांत भूसंपादनाचे सर्वेक्षण

By admin | Updated: November 7, 2014 23:32 IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : विनायक राऊत, राधाकृष्णन यांची माहिती

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर होणार असून, त्यासाठीचे जिल्ह्यातील भूसंपादन सर्वेक्षण येत्या सहा महिन्यांत द्रुतगतीने पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न असेल. चौपदरीकरणासाठी सुमारे १००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील १०३ गावांमधील जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे, अशी माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी खासदार राऊत यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. चौपदरीकरणात या चार तालुक्यांतील १०३ गावे समाविष्ट आहेत. या चार तालुक्यातील भूसंपादनासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यासाठीचे सातबारा उतारेही तयार आहेत. प्रत्यक्ष सर्वेक्षणात कोणाची किती जागा जाणार हे स्पष्ट होणार आहे. उर्वरित पाच तालुक्यांमध्ये सातबारा तयार करणे, चौपदरीकरणाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करणे ही प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. यासाठी १४ पुलांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौपदरीकरणासाठी मोजणी आणि सर्वेक्षण हे काम किमान सहा महिन्यांत होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतील, असे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.लांजाची बाजारपेठ महामार्गावरच असल्याने तेथे उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच राजापूरवासीयांनाही नागमोडी वळणांऐवजी पर्यायी मार्ग हवा आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, यात समाविष्ट गावांमधील जमीन संपादित करताना नवीन भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच घेतल्या जातील. मोजणी सदोष होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सर्वेक्षण होणार चौपट वेगानेरायगड जिल्ह्यात महामार्ग भूसंपादनाच्या सर्वेक्षण व संपादन प्रक्रियेस दोन वर्षे लागली. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात यासाठी सहा महिन्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव व सातबारा तयार आहेत. त्यामुळे हे काम जास्तीत जास्त लवकर कसे होईल, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सांगितले. उदय सामंत अनुपस्थितचौपदरीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठक व पत्रकार परिषदेस खासदार राऊत यांच्याबरोबर सेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व शिवसेनेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत या कार्यक्रमात कुठेही दिसून आले नाही. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकवीरा देवीच्या दर्शनास सेनेचे अन्य सर्व आमदार उपस्थित होते. मात्र, सामंत अनुपस्थित होते व बैठकीसही अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.