शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलांसाठी भूसंपादन आता राज्याच्या निधीतून, मंत्रिमंडळाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:51 IST

राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल, तसेच रेल्वेवरून अथवा खालून जाणाऱ्या रस्त्यांच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन आता राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून यासाठी निधी देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल, तसेच रेल्वेवरून अथवा खालून जाणाऱ्या रस्त्यांच्या उभारणीसाठी आवश्यक भूसंपादन आता राज्य शासनाच्या निधीतून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून यासाठी निधी देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक प्रकल्प मार्गी लागून राष्ट्रीय महामार्गांची कामे गतीने पूर्ण होणार आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या व भविष्यात राबविण्यात येणाºया उड्डाणपूल, आरओबी, आरयूबी प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनासाठी या महाभियानातून निधी दिला जाणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्था, तर उर्वरित क्षेत्रातील ड वर्ग महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये हा निर्णय लागू असणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक कार्यवाही करूनही जागा संपादित करणे शक्य नसल्याचे संबंधित जिल्हाधिकाºयांनी प्रमाणित केल्यानंतर असे भूसंपादन राज्य शासनाच्या भूसंपादन धोरणानुसार करण्यात येईल. भूसंपादनासाठी द्यावयाच्या मोबदल्याची परिगणना राज्य शासनाच्या भूसंपादन धोरणामध्ये ठरविलेल्या दरानुसार करण्यात येईल. हा निधी उपलब्ध करून देताना वित्तीय आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सर्व पात्र महापालिकांसाठी राज्याचा हिस्सा ७० टक्के असणार असून ३० टक्के हिस्सा संबंधित महापालिकांनी द्यावयाचा आहे. तसेच अ वर्ग नगर परिषदांना ७५ टक्के, ब वर्ग नगर परिषदांना ८५ टक्के, तर क वर्ग नगर परिषदा तसेच नगर पंचायती यांना ९० टक्के हिस्सा राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.निधी देण्याची तरतूद फक्त एक वेळाचनगरोत्थान महाअभियानामधून भूसंपादनासाठी निधी देण्याबाबतची ही तरतूद फक्त एक वेळ निधी देण्यापुरती मर्यादित असेल व त्यानंतर न्यायालयाच्या किंवा इतर कोणत्याही आदेशांमुळे अशा जमिनीच्या मोबदल्यात वाढ करण्याचे आदेश झाल्यास त्याची भरपाई या योजनेतून करण्यात येणार नाही. ती जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र