शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘भूमी संपादन विधेयक शेतकऱ्यांना संपवणारे’

By admin | Updated: January 20, 2015 01:47 IST

केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू,

पुणे : केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू, अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात दिली.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्यावतीने (युक्रांद) कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित ‘भूमी संपादन विधेयक : शेतकऱ्यांसाठी आपत्ती’ या विषयावर नागरी सभा आयोजित करण्यात आली होती. स्मारक निधी आणि युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी वक्ते म्हणून उपस्थित होते.भारतात येऊ घातलेली १८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक थांबली होती. ती यावी म्हणून हे विधेयक आणल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, जगातील २४ टक्के शेतकरी भारतात आहेत. भारतातील हा शेतकरीवर्ग १२ कोटी मजुरांना रोजगार देतो. भारतात येऊ पाहणारी गुंतवणूक किती लोकांना रोजगार देणार आहे, असा प्रश्न मुळीक यांनी उपस्थित केला.चौधरी म्हणाले, १९९१मध्ये भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर जमीन अधिग्रहणात मोठी वाढ झाली. मात्र, अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून शेतीयोग्य जमीन उद्योगांसाठी वापरता येत नव्हती. मोदी सरकारने ही अटदेखील काढून टाकली आहे. एखाद्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी ७० टक्के संबंधित जमीनमालकांची मंजुरी अनिवार्य असल्याच्या नियमालाही नव्या विधेयकात मूठमाती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आधीच्या आघाडी सरकारने तयार केलेल्या या विधेयकात लष्कराचा अपवाद वगळता इतर कोणाला कोणत्याही कारणासाठी शेतजमीन ताब्यात घेता येणार नव्हती. मात्र, मोदी सरकारने यात बदल करून इतर क्षेत्रांनाही शेतजमीन देण्याची तरतूद केली आहे. आम्ही याला ठाम विरोध करू . आम्ही या सरकारसोबत आहोत. एखाद्या मुद्यावर सहमती नाही म्हणून सरकार वाईट, अशी अपरिपक्व भूमिका आमची नाही. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केल्यास देशभरात जेथे जेथे भूमी अधिग्रहणाविरोधात आंदोलने होत आहे, तेथे जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना सक्रिय पाठिंबा देईल, असे खा. राजू शेट्टी म्हणाले.