शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘भूमी संपादन विधेयक शेतकऱ्यांना संपवणारे’

By admin | Updated: January 20, 2015 01:47 IST

केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू,

पुणे : केंद्र सरकारने नवीन तरतुदींसह सादर केलेले भूमी संपादन विधेयक हे शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवणारे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊ नये यासाठी सर्व शक्तीनिशी विरोध करू, अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी सोमवारी पुण्यात दिली.महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्यावतीने (युक्रांद) कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित ‘भूमी संपादन विधेयक : शेतकऱ्यांसाठी आपत्ती’ या विषयावर नागरी सभा आयोजित करण्यात आली होती. स्मारक निधी आणि युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी वक्ते म्हणून उपस्थित होते.भारतात येऊ घातलेली १८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक थांबली होती. ती यावी म्हणून हे विधेयक आणल्याचे सरकार सांगत आहे. मात्र, जगातील २४ टक्के शेतकरी भारतात आहेत. भारतातील हा शेतकरीवर्ग १२ कोटी मजुरांना रोजगार देतो. भारतात येऊ पाहणारी गुंतवणूक किती लोकांना रोजगार देणार आहे, असा प्रश्न मुळीक यांनी उपस्थित केला.चौधरी म्हणाले, १९९१मध्ये भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर जमीन अधिग्रहणात मोठी वाढ झाली. मात्र, अन्नसुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून शेतीयोग्य जमीन उद्योगांसाठी वापरता येत नव्हती. मोदी सरकारने ही अटदेखील काढून टाकली आहे. एखाद्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी ७० टक्के संबंधित जमीनमालकांची मंजुरी अनिवार्य असल्याच्या नियमालाही नव्या विधेयकात मूठमाती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)आधीच्या आघाडी सरकारने तयार केलेल्या या विधेयकात लष्कराचा अपवाद वगळता इतर कोणाला कोणत्याही कारणासाठी शेतजमीन ताब्यात घेता येणार नव्हती. मात्र, मोदी सरकारने यात बदल करून इतर क्षेत्रांनाही शेतजमीन देण्याची तरतूद केली आहे. आम्ही याला ठाम विरोध करू . आम्ही या सरकारसोबत आहोत. एखाद्या मुद्यावर सहमती नाही म्हणून सरकार वाईट, अशी अपरिपक्व भूमिका आमची नाही. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठणार असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर केल्यास देशभरात जेथे जेथे भूमी अधिग्रहणाविरोधात आंदोलने होत आहे, तेथे जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांना सक्रिय पाठिंबा देईल, असे खा. राजू शेट्टी म्हणाले.