शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

लाखभर विद्यार्थ्यांवर लातूर सोडण्याची वेळ

By admin | Updated: March 28, 2016 03:12 IST

मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने

- दत्ता थोरे, विशाल सोनटक्के, प्रताप नलावडे ; लातूर, उस्मानाबाद, बीड

मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने १ एप्रिलनंतर शहरातील महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करण्याचा फतवा काढल्याने ‘लातूर पॅटर्न’मुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या परजिल्ह्यातील लाखभर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना शहर सोडावे लागणार आहे. ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या बीड जिल्ह्यातून या वर्षी छोट्या शेतकऱ्यांनीदेखील कोयता हाती घेतल्याने स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. सीईटीच्या तयारीसाठी परजिल्ह्यातून सुमारे ७० हजारांहून अधिक मुले आणि त्यांचे पालक लातूर शहरात आहेत. काहींनी फक्त मुलांच्या शिक्षणासाठी घरसुद्धा विकत घेतले आहे. शहरात ७० खासगी व २५ महाविद्यालयांची वसतिगृहे आहेत. १ एप्रिलनंतर महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करावेत, असा फतवा काढून जिल्हा प्रशासन मोकळे झाले आहे. मुलांना गावी पाठवून महाविद्यालये कशी बंद ठेवायची, असा सवाल सोनवणे महाविद्यालयालयाचे प्रा. संजीव सोनवणे यांनी केला आहे. उस्मानाबादेत कारखाने बंदजिल्ह्यात १७पैकी ७ कारखान्यांनीच गाळप हंगाम घेतला. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही. सीना-कोळेगाव हा प्रकल्प कोरडा पडला आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बागायतदार कुटुंबांनी आता कामासाठी बाहेरगावचा रस्ता धरला आहे. विद्यार्थीगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरवर्षी साधारणत: पाच ते सात टक्के विद्यार्थी परीक्षा देत नसल्याचे दिसून येत होते. मात्र, या वर्षी हे प्रमाण तब्बल २२ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाच हजार विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा शुल्कच भरले नव्हते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर यांनी दिली.नांदेडमध्ये विद्यार्थ्याचा ‘पाणीबळी’पाणी घेण्यासाठी टँकरवर चढताना खाली पडून टायरखाली आल्याने १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी नवनाथ गोविंद बागल जागीच ठार झाल्याची घटना नांदेड तालुक्यातील काकांडी येथे रविवारी दुपारी घडली. नवनाथच्या शरीरावरून टँकरचे मागचे चाक गेले. काकांडी येथील पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून बंदच असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लातूरमध्ये 750 उद्योग बंदलातूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीतील ७५० उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील मजुरांसह हमाल आणि शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांनी स्थलांतराचा पर्याय निवडला. जिल्ह्यातील ९४५पैकी निम्म्यांहून अधिक गावांतील लोकांनी पुणे-मुंबईसह औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूरचा रस्ता धरला आहे.बीडमधून मजुरांचे स्थलांतरबीड जिल्ह्यातून राज्यातील साखर कारखान्यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांवर ऊसतोडणी मजूर जातात. शिरूर, पाटोदा, आष्टी, धारूर, केज या तालुक्यांतून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर दरवर्षी होत असते. यंदा दुष्काळामुळे छोट्या शेतकऱ्यांवरही ऊसतोडणी मजूर म्हणून गाव सोडण्याची पाळी आली आहे. बीड जिल्ह्यातील सहापैकी चार साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटलेले नाहीत. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची संख्या वाढली आहे.