शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

लाखभर विद्यार्थ्यांवर लातूर सोडण्याची वेळ

By admin | Updated: March 28, 2016 03:12 IST

मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने

- दत्ता थोरे, विशाल सोनटक्के, प्रताप नलावडे ; लातूर, उस्मानाबाद, बीड

मराठवाड्यातील दुष्काळ स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील अनेकांनी कामाच्या शोधात गाव सोडले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने १ एप्रिलनंतर शहरातील महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करण्याचा फतवा काढल्याने ‘लातूर पॅटर्न’मुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या परजिल्ह्यातील लाखभर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना शहर सोडावे लागणार आहे. ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या बीड जिल्ह्यातून या वर्षी छोट्या शेतकऱ्यांनीदेखील कोयता हाती घेतल्याने स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या सहा लाखांवर गेली आहे. सीईटीच्या तयारीसाठी परजिल्ह्यातून सुमारे ७० हजारांहून अधिक मुले आणि त्यांचे पालक लातूर शहरात आहेत. काहींनी फक्त मुलांच्या शिक्षणासाठी घरसुद्धा विकत घेतले आहे. शहरात ७० खासगी व २५ महाविद्यालयांची वसतिगृहे आहेत. १ एप्रिलनंतर महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद करावेत, असा फतवा काढून जिल्हा प्रशासन मोकळे झाले आहे. मुलांना गावी पाठवून महाविद्यालये कशी बंद ठेवायची, असा सवाल सोनवणे महाविद्यालयालयाचे प्रा. संजीव सोनवणे यांनी केला आहे. उस्मानाबादेत कारखाने बंदजिल्ह्यात १७पैकी ७ कारखान्यांनीच गाळप हंगाम घेतला. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या हाताला काम नाही. सीना-कोळेगाव हा प्रकल्प कोरडा पडला आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बागायतदार कुटुंबांनी आता कामासाठी बाहेरगावचा रस्ता धरला आहे. विद्यार्थीगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरवर्षी साधारणत: पाच ते सात टक्के विद्यार्थी परीक्षा देत नसल्याचे दिसून येत होते. मात्र, या वर्षी हे प्रमाण तब्बल २२ टक्क्यांवर पोहोचले आहे. पाच हजार विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा शुल्कच भरले नव्हते, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक डॉ. अशोक मोहेकर यांनी दिली.नांदेडमध्ये विद्यार्थ्याचा ‘पाणीबळी’पाणी घेण्यासाठी टँकरवर चढताना खाली पडून टायरखाली आल्याने १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी नवनाथ गोविंद बागल जागीच ठार झाल्याची घटना नांदेड तालुक्यातील काकांडी येथे रविवारी दुपारी घडली. नवनाथच्या शरीरावरून टँकरचे मागचे चाक गेले. काकांडी येथील पाणीपुरवठा योजना १५ ते २० वर्षांपासून बंदच असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. लातूरमध्ये 750 उद्योग बंदलातूर जिल्ह्यात औद्योगिक वसाहतीतील ७५० उद्योग पाण्याअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे या उद्योगातील मजुरांसह हमाल आणि शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांनी स्थलांतराचा पर्याय निवडला. जिल्ह्यातील ९४५पैकी निम्म्यांहून अधिक गावांतील लोकांनी पुणे-मुंबईसह औरंगाबाद, नाशिक व कोल्हापूरचा रस्ता धरला आहे.बीडमधून मजुरांचे स्थलांतरबीड जिल्ह्यातून राज्यातील साखर कारखान्यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कारखान्यांवर ऊसतोडणी मजूर जातात. शिरूर, पाटोदा, आष्टी, धारूर, केज या तालुक्यांतून सर्वाधिक मजुरांचे स्थलांतर दरवर्षी होत असते. यंदा दुष्काळामुळे छोट्या शेतकऱ्यांवरही ऊसतोडणी मजूर म्हणून गाव सोडण्याची पाळी आली आहे. बीड जिल्ह्यातील सहापैकी चार साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा पेटलेले नाहीत. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची संख्या वाढली आहे.