शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाणे पोलीस दलात ‘लखोबा लोखंडे’! तब्बल ७ विवाह, निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 05:51 IST

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या लोकप्रिय नाटकातील लखोबा लोखंडे हे अजरामर पात्र प्रत्यक्षात ठाणे पोलीस दलात अवतरले आहे. येथील एक पोलीस हवालदार एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा बोहल्यावर चढल्याचे उघडकीस आले आहे.

- जमीर काझीमुंबई : साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या लोकप्रिय नाटकातील लखोबा लोखंडे हे अजरामर पात्र प्रत्यक्षात ठाणे पोलीस दलात अवतरले आहे. येथील एक पोलीस हवालदार एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा बोहल्यावर चढल्याचे उघडकीस आले आहे. पहिल्या पत्नीपासून रीतसर घटस्फोट न घेता त्याने खात्याचा धाक व असाहाय्य महिलांचा गैरफायदा घेत विवाह रचले आहेत.पोलीस नाईक सूर्यकांत काशीनाथ कदम असे त्याचे नाव असून तो मानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्याच्या या गैरवर्तनाबद्दल आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे. अधिकाराचा गैरवापर आणि खात्याची प्रतिमा डागाळणारे वर्तन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे. त्याच्या एका पत्नीने त्याबाबत तक्रार दिल्यानंतर झालेल्या विभागीय चौकशीतून त्याचे हे ‘प्रताप’ चव्हाट्यावर आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सूर्यकांत कदम याने १९८६ मध्ये पहिल्यांदा वनिता यांच्याबरोबर विवाह केला होता. ड्युटीच्या निमित्ताने पोलीस ठाण्यात येणाºया असाहाय्य तरुणींना तो पदाचा गैरफायदा घेत आमिष दाखवून विवाह करीत असे. पहिल्या पत्नीबरोबर राहत असताना त्याने ३० डिसेंबर २०१२ रोजी अनिता हिच्यासोबत कोल्हापुरातील मंदिरात विवाह केला. त्यानंतर पुढच्याच वर्षी मेघाबाई या महिलेशी तर २५ एप्रिलला मंजिरी हिच्याबरोबर चौथा विवाह केला. त्यानंतर तीन वर्षांनी मनाली नावाच्या तर १२ आॅक्टोबर २०१७ रोजी त्याने जयललिता हिच्यासोबत मंदिरात सहावा विवाह केला. २०१४ मध्ये त्याने श्यामला नावाच्या महिलेबरोबर विवाह केला.साक्षीदारांचे जबाब नोंदविलेसूर्यकांत कदम याच्या सात पत्नींपैकी दोन पत्नी मयत झाल्या आहेत. तर सातव्या पत्नीबरोबर सध्या तो राहत आहे. याबाबत चौकशी अधिकाºयांनी फसवणूक झालेल्या संबंधित महिलांचे तसेच विवाहावेळी उपस्थित असलेल्या सरकारी साक्षीदारांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. सात विवाह करताना कदमने एकीलाही घटस्फोट दिलेला नसल्याचे चौकशीतून पुढे आले आहे, असे चौकशी अधिकाºयांनी सांगितले.

- सध्या सूर्यकांत कदम हा २०१४ मध्ये विवाह केलेल्या श्यामला हिच्यासोबत राहत आहे.पोलीस असल्याने असाहाय्य महिलांचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक करणे अयोग्य आहे. संबंधित पोलिसाचे वर्तन हे नैतिक अध:पतनात मोडत असल्याने खात्याची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. खात्यात बेशिस्त व गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत.- परमबीर सिंग(पोलीस आयुक्त, ठाणे)

टॅग्स :Policeपोलिस