शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीत आपात्कालीन सुविधेचा अभाव

By admin | Updated: July 20, 2016 19:58 IST

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत अपातकालीन सुविधाचा अभाव कायमच असून परिसरात जपान सरकारच्या मदतीने विकसाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड, दि. 20 - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत अपातकालीन सुविधाचा अभाव कायमच असून परिसरात जपान सरकारच्या मदतीने विकसाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असतांना प्रथमउपचार,रुग्णवाहीका, अग्निशामक बंब, दुरसंचार सेवा सारख्या आपात कालीन सुविधा जगप्रसिद्ध ठिकाणी अदयापही पोहचल्या नाहित. यामुळे लेणीत कुंडात पडून मरण पावलेल्या यूवकाच्या प्रेताची अवहेलना झाली.शुक्रवारी सेल्फी काढण्याच्या नादांत तरुणाचा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या सप्तकृडांत पडून पाण्यात बुडून मुत्यू झाला होता. घटनेमुळे पुन्हा ऐकदा जगप्रसिद्ध 'अजिंठा लेणीत' 'आपातकालीन' असुविधेचे दर्शन घडले .मृतदेहाचा खडतर प्रवास... शुक्रवारी कुंडात पडलेल्या जालना जिल्हातील तरूणाचा मृतदेह शनिवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढूण बस प्रतिक्षालयापर्यंत माणसांनी उचलून आणले.नंतर एसटीच्या बसने अजिंठा टि पाईट पर्यत आणून दुसर्‍या वाहनाने नेण्यात आले. या पूर्वी येथे अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत मात्र असुविधा कायमच आहे.

साधा प्रथम उपचार सुध्दा नाही...जगप्रसिद्ध ठिकाणी भेट देण्यासाठी येथे दररोज शेकडो देशी विदेशी पर्यटक येतात. डोंगरदरीत आलेल्या पर्यटकांना येथे साधी प्रथम उपचार सुविधा सुध्दा उपलब्ध नाही.तसेच लेण्यांमध्ये कुढलीही मोबाईल रेंज नसल्याने दुरून आलेल्या पर्यटकांना नातलगासह इतरांशी संर्पक साधन्यास पर्यायी व्यवस्था नाही. आपात्कालीनप्रसंगी मोठी फजिती होते.अग्निशमन बंम नाही.. ट्रॉमा सुध्दा रखडले..अजिंठा परिसरात डोगंरदरित अनेकदा वणवा पेटण्याच्या घटना सतत घडतात.विशेष म्हणंजे लेणी परिसरातील जंगलाला आग लागल्यास वाहन प्रवेशबंदी मुळे वन विभागाच्या कर्मचार्‍यानां आग विझविण्यासाठी मोठी फजिती होते.तसेच अग्निशामक बंब अभावी महामार्गवर सुध्दा आगीमुळे अनेक वाहनांची राखोळी तर झालीच शिवाय अनेकांचा बळी सुध्दा गेल्याचा घटना घडल्या आहेत.तर अजिंठागावात मंजूर ट्रॉमाचे बांधकामच सा.बा.विभागाच्या ठेकेदाराच्या प्रेमापोटी अनेक वर्षापासून रखडल्याने महामार्गवरील अपघातग्रस्त पर्यटकांना तातडीचे उपचार सुध्दा मिळत नसल्याने अनेकाचा उपचाराअभावी बळी सुध्दा जात आहे. दोन गावाना सुध्दा फटका.. तब्बल ३०,४० किमीचा फेरा..अजिंठा टि पाईटं ते लेण्या प्रर्यतच्या ४ कि. मी अंतरावर एसटीच्या प्रदुषण विरहीत बसेस वगळता इतर वाहनाना प्रवेश बंदी आहे.याच मार्गावरून लेण्यांच्या माथ्यावरच असलेले सावरखेडा,लेणांपूर या गावांना याच बसने जावे-यावे लागते.रात्रीच्या सुमारास या बसेस बंद असल्याने या दोन्ही गांवाना आपातकालीन प्रंसगी खाजगी वाहनाने हलदा , सोयगाव मार्गे तब्बल ३० ते ४० कि.मी.चा फेरा मारावा लागतो.शिवाय या स्थानीक लोकांना या बस मधे सवलत नाही.4 की मी चे भाड़े 20 रुपयेपर्यटन विभाग येथे येणाऱ्या पर्यटकांची लूट करत आहे. फर्दापुर टी पॉइंट ते लेणी केवळ 4 की. मी.अंतर आहे. प्रदूषण मुक्त बसच्या नावाखाली 20 रुपये भाड़े वसूल केल्या जाते. ही एक प्रकारची लूट असल्याचे पर्यटक बोलतात.