शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

अजिंठा लेणीत आपात्कालीन सुविधेचा अभाव

By admin | Updated: July 20, 2016 19:58 IST

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत अपातकालीन सुविधाचा अभाव कायमच असून परिसरात जपान सरकारच्या मदतीने विकसाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड, दि. 20 - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत अपातकालीन सुविधाचा अभाव कायमच असून परिसरात जपान सरकारच्या मदतीने विकसाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत असतांना प्रथमउपचार,रुग्णवाहीका, अग्निशामक बंब, दुरसंचार सेवा सारख्या आपात कालीन सुविधा जगप्रसिद्ध ठिकाणी अदयापही पोहचल्या नाहित. यामुळे लेणीत कुंडात पडून मरण पावलेल्या यूवकाच्या प्रेताची अवहेलना झाली.शुक्रवारी सेल्फी काढण्याच्या नादांत तरुणाचा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या सप्तकृडांत पडून पाण्यात बुडून मुत्यू झाला होता. घटनेमुळे पुन्हा ऐकदा जगप्रसिद्ध 'अजिंठा लेणीत' 'आपातकालीन' असुविधेचे दर्शन घडले .मृतदेहाचा खडतर प्रवास... शुक्रवारी कुंडात पडलेल्या जालना जिल्हातील तरूणाचा मृतदेह शनिवारी सकाळी पाण्यातून बाहेर काढूण बस प्रतिक्षालयापर्यंत माणसांनी उचलून आणले.नंतर एसटीच्या बसने अजिंठा टि पाईट पर्यत आणून दुसर्‍या वाहनाने नेण्यात आले. या पूर्वी येथे अनेकदा अशा दुर्घटना घडल्या आहेत मात्र असुविधा कायमच आहे.

साधा प्रथम उपचार सुध्दा नाही...जगप्रसिद्ध ठिकाणी भेट देण्यासाठी येथे दररोज शेकडो देशी विदेशी पर्यटक येतात. डोंगरदरीत आलेल्या पर्यटकांना येथे साधी प्रथम उपचार सुविधा सुध्दा उपलब्ध नाही.तसेच लेण्यांमध्ये कुढलीही मोबाईल रेंज नसल्याने दुरून आलेल्या पर्यटकांना नातलगासह इतरांशी संर्पक साधन्यास पर्यायी व्यवस्था नाही. आपात्कालीनप्रसंगी मोठी फजिती होते.अग्निशमन बंम नाही.. ट्रॉमा सुध्दा रखडले..अजिंठा परिसरात डोगंरदरित अनेकदा वणवा पेटण्याच्या घटना सतत घडतात.विशेष म्हणंजे लेणी परिसरातील जंगलाला आग लागल्यास वाहन प्रवेशबंदी मुळे वन विभागाच्या कर्मचार्‍यानां आग विझविण्यासाठी मोठी फजिती होते.तसेच अग्निशामक बंब अभावी महामार्गवर सुध्दा आगीमुळे अनेक वाहनांची राखोळी तर झालीच शिवाय अनेकांचा बळी सुध्दा गेल्याचा घटना घडल्या आहेत.तर अजिंठागावात मंजूर ट्रॉमाचे बांधकामच सा.बा.विभागाच्या ठेकेदाराच्या प्रेमापोटी अनेक वर्षापासून रखडल्याने महामार्गवरील अपघातग्रस्त पर्यटकांना तातडीचे उपचार सुध्दा मिळत नसल्याने अनेकाचा उपचाराअभावी बळी सुध्दा जात आहे. दोन गावाना सुध्दा फटका.. तब्बल ३०,४० किमीचा फेरा..अजिंठा टि पाईटं ते लेण्या प्रर्यतच्या ४ कि. मी अंतरावर एसटीच्या प्रदुषण विरहीत बसेस वगळता इतर वाहनाना प्रवेश बंदी आहे.याच मार्गावरून लेण्यांच्या माथ्यावरच असलेले सावरखेडा,लेणांपूर या गावांना याच बसने जावे-यावे लागते.रात्रीच्या सुमारास या बसेस बंद असल्याने या दोन्ही गांवाना आपातकालीन प्रंसगी खाजगी वाहनाने हलदा , सोयगाव मार्गे तब्बल ३० ते ४० कि.मी.चा फेरा मारावा लागतो.शिवाय या स्थानीक लोकांना या बस मधे सवलत नाही.4 की मी चे भाड़े 20 रुपयेपर्यटन विभाग येथे येणाऱ्या पर्यटकांची लूट करत आहे. फर्दापुर टी पॉइंट ते लेणी केवळ 4 की. मी.अंतर आहे. प्रदूषण मुक्त बसच्या नावाखाली 20 रुपये भाड़े वसूल केल्या जाते. ही एक प्रकारची लूट असल्याचे पर्यटक बोलतात.