शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

हत्येच्या तपासात समन्वयाचा अभाव - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:11 IST

गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांच्या तपासामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवित दोन्ही हत्यांचा तपास एकाच तपास यंत्रणेने करणे योग्य नाही नाही का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केला.

मुंबई : गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांच्या तपासामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवित दोन्ही हत्यांचा तपास एकाच तपास यंत्रणेने करणे योग्य नाही नाही का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केला.आरोपी व पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या अधिकारामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे, असे म्हणत न्यायालयाने पानसरे हत्येच्या खटल्याला दिलेली स्थगितीही २३ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. पानसरे हत्येप्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, डॉ. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येचा काही संबंध आहे का, याचाही तपास तपासयंत्रणा करत असल्याने राज्य सीआयडीने पानसरे हत्या प्रकरणाच्या खटल्याला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी गुरुवारी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यापुढे होती.या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. दोन्ही केसेसमध्ये मारेकरी आणि कट रचणाºया व्यक्ती जास्त आहेत. त्यामुळे या खटल्याला स्थगिती देणे, हेच सद्य:स्थितीत योग्य आहे, असे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपी वीरेंद्र तावडे याच्या वतीने त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी यावर आक्षेप घेतला. आरोपी २०१६पासून कारागृहात आहे. त्यामुळे त्याच्या अधिकाराचाही विचार करावा लागेल, असे पुनाळेकर यांनी न्यायालयाला सांगितले.त्यावर न्या. डेरे यांनी म्हटले की, आरोपी व पीडित व्यक्तीच्या कुटुंबांच्या अधिकारांमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. या अर्जावर २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेऊ. तोपर्यंत खटल्याला दिलेली स्थगिती कायम राहील, असेही न्यायालयाने सांगितले.एकत्र बैठकन्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांमध्ये (सीआयडी आणि सीबीआय) समन्वयाचा अभाव असल्याचे निरीक्षणही नोंदविले. ‘दोन्ही हत्यांमध्ये एकच दुवा असल्याचे तुम्ही (सीआयडी) म्हणता, मग या दोन्ही हत्यांचा तपास एकाच तपास यंत्रणेने करणे योग्य नाही का? दुसरी केस सीबीआयकडे वर्ग करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे,’ असे न्या. डेरे यांनी म्हटले. त्यावर मुंदर्गी यांनी दोन्ही तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाºयांची एकत्र बैठक झाल्याची माहिती न्यायालयाला दिली.

टॅग्स :Courtन्यायालय