शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

शासन भरवणार ‘कुसुमाग्रज महोत्सव’

By admin | Updated: July 19, 2016 17:40 IST

आपल्या तेजस्वी लेखणीद्वारे अवघ्या साहित्यविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावाने आता महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज महोत्सव’ भरवण्याच्या विचारात

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 19 - आपल्या तेजस्वी लेखणीद्वारे अवघ्या साहित्यविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावाने आता महाराष्ट्र शासन ‘कुसुमाग्रज महोत्सव’ भरवण्याच्या विचारात आहे. या महोत्सवातून कुसुमाग्रजांचे साहित्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याने मराठीत अढळ स्थान प्राप्त केले आहे. कवी, लेखक, नाटककार असे अनेक पैलू असणाऱ्या तात्यासाहेबांच्या लेखणीतून ‘विशाखा’, ‘प्रवासी पक्षी’सारखे काव्यसंग्रह, ‘नटसम्राट’, ‘कौंतेय’ यांसारखी नाटके, तर ‘वैष्णव’, ‘जान्हवी’ यांसारख्या सकस कादंबऱ्या मराठी साहित्यात अवतरल्या. त्यांनी दिलेल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च अशा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) राज्यभरात मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो व यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर केला जातो. नाशकात कुसुमाग्रजांच्या हयातीत स्थापन झालेली कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही संस्था कार्यरत असून, या संस्थेद्वारे साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात योगदान दिले जाते. प्रतिष्ठानच्या वतीने ‘जनस्थान’ व ‘गोदावरी गौरव’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कारही दिले जातात. तथापि, कुसुमाग्रजांचे साहित्य व विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी काय करता येईल, याचा विचार राज्य शासनाच्या वतीने होत असून, कुसुमाग्रजांच्या नावाने लवकरच ‘कुसुमाग्रज महोत्सव’च भरवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या महोत्सवातून तात्यासाहेबांच्या साहित्याची ओळख युवा पिढीला करून देण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात सांस्कृतिक कार्य तथा मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या साहित्याचा जागर होणार आहे. महोत्सवात कुसुमाग्रजांच्या कविता, नाटके व अन्य लेखणावर राज्यातील मान्यवरांकडून प्रकाश टाकला जाणार असून, यावेळी कुसुमाग्रजांची पुस्तकेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. महोत्सव नाशिकला? कुसुमाग्रज महोत्सव आयोजित करण्याचा राज्य शासनाचा विचार असला, तरी हा महोत्सव नेमका कोठे व कधी घेतला जाईल, याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही; मात्र कुसुमाग्रजांचे गाव असलेल्या नाशिकमध्येच हा महोत्सव भरवला जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.