शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोकणात काँग्रेसमध्ये धूमशान! सिंधुदुर्गची कार्यकारिणी बरखास्त, पक्ष संपत आल्यावर जिल्हाध्यक्ष बदलल्याचा आरोप

By अतुल कुलकर्णी | Updated: September 17, 2017 02:49 IST

जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्यात बदल करा, नारायण राणेंपासून संरक्षण द्या, अशा मागण्या करत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले.

मुंबई : जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्यात बदल करा, नारायण राणेंपासून संरक्षण द्या, अशा मागण्या करत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते उरले नसताना सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष बदलून काय उपयोग? अशा संतप्त प्रतिक्रीया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये उमटल्या आहेत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सांगितले म्हणून शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त केल्या. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांच्या नियुक्तीचे पत्रक काढले. सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत. भाई सावंत हे शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. विकास सावंत यांनी कोकणातील काँग्रेसवासीयांचे गा-हाणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मांडले होते. राणे आम्हाला संपवायला निघाले आहेत. मूळ निष्ठावंतांकडे लक्ष द्या, असे सांगणाºया सावंत यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे काही जण वैतागून शिवसेनेत गेले, काही पक्ष सोडून घरी बसले. ज्यांनी राणे यांच्याशी यांच्याशी जुळवून घेतले ते त्यांच्यासोबत गेले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते नाहीत, असेही हा नेता म्हणाला.रत्नागिरीत निलेश राणे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे होते, त्यासाठी राणे यांनी सतत पाठपुरावा केला. पण त्यावेळी अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. हाच राग निलेश राणे यांनी सोशल मीडीयातून काढला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी म्हणून हुसेन दलवाई आणि राजन भोसले यांना पाठवले. त्यावेळी भाई जगताप यांना पाठवले नाही. तेथे नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन गदारोळ केला. त्यांनीच याच्या बातम्या सोशल मीडियातही टाकल्या.राणे मोठ्या समर्थकांसह आता भाजपाच्या वाटेवर असल्याने कोकणात खरा संघर्ष शिवसेना विरुध्द भाजपा असा रंगेल आणि या सगळ्यात काँग्रेस चौथ्या नंबरवर जाईल असे चित्र कोकणात निर्माण झाले आहे.