शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कोकणात काँग्रेसमध्ये धूमशान! सिंधुदुर्गची कार्यकारिणी बरखास्त, पक्ष संपत आल्यावर जिल्हाध्यक्ष बदलल्याचा आरोप

By अतुल कुलकर्णी | Updated: September 17, 2017 02:49 IST

जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्यात बदल करा, नारायण राणेंपासून संरक्षण द्या, अशा मागण्या करत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले.

मुंबई : जेव्हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी जिल्ह्यात बदल करा, नारायण राणेंपासून संरक्षण द्या, अशा मागण्या करत होते तेव्हा प्रदेश काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते उरले नसताना सिंधुदुर्गचा जिल्हाध्यक्ष बदलून काय उपयोग? अशा संतप्त प्रतिक्रीया काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये उमटल्या आहेत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सांगितले म्हणून शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्ह्यातील ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त केल्या. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांच्या नियुक्तीचे पत्रक काढले. सावंत हे राज्याचे माजी मंत्री भालचंद्र उर्फ भाई सावंत यांचे चिरंजीव आहेत. भाई सावंत हे शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. विकास सावंत यांनी कोकणातील काँग्रेसवासीयांचे गा-हाणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मांडले होते. राणे आम्हाला संपवायला निघाले आहेत. मूळ निष्ठावंतांकडे लक्ष द्या, असे सांगणाºया सावंत यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, असे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. त्यामुळे काही जण वैतागून शिवसेनेत गेले, काही पक्ष सोडून घरी बसले. ज्यांनी राणे यांच्याशी यांच्याशी जुळवून घेतले ते त्यांच्यासोबत गेले. आता जिल्ह्यात पक्षाचे बॅनर लावायलाही कार्यकर्ते नाहीत, असेही हा नेता म्हणाला.रत्नागिरीत निलेश राणे यांना जिल्हाध्यक्ष व्हायचे होते, त्यासाठी राणे यांनी सतत पाठपुरावा केला. पण त्यावेळी अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. हाच राग निलेश राणे यांनी सोशल मीडीयातून काढला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी म्हणून हुसेन दलवाई आणि राजन भोसले यांना पाठवले. त्यावेळी भाई जगताप यांना पाठवले नाही. तेथे नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन गदारोळ केला. त्यांनीच याच्या बातम्या सोशल मीडियातही टाकल्या.राणे मोठ्या समर्थकांसह आता भाजपाच्या वाटेवर असल्याने कोकणात खरा संघर्ष शिवसेना विरुध्द भाजपा असा रंगेल आणि या सगळ्यात काँग्रेस चौथ्या नंबरवर जाईल असे चित्र कोकणात निर्माण झाले आहे.