शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कोकणच्या हापूसचा पुन्हा झिम्मा !

By admin | Updated: June 8, 2016 04:53 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या मातीत पिकणाऱ्या हापूसला जगात तोड नाही.

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या मातीत पिकणाऱ्या हापूसला जगात तोड नाही. रंग, रूप आणि स्वाद यामध्ये सरस असलेल्या इथल्या हापूसवर आता जीआय मानांकनाची (जिओग्राफिकल इंडिकेशन) मोहर उमटणार आहे. येत्या पंधरवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे हापूसच्या नावाखाली होणाऱ्या इतर आंब्यांच्या विक्रीला लगाम बसून कोकणचा राजा जगभरात झिम्मा खेळेल. देवगड, रत्नागिरीतील हापूस म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा बाजारात दाखल झाला की...‘हापूस इलो, हापूस इलो’चा एकच जयघोष होतो. परंतु कुठेही पिकणारा पण हापूससारखा दिसणारा आंबाही ‘हापूस’ त्यातही देवगड, रत्नागिरीचा हापूस म्हणून सर्रासपणे विकला जात होता. यामुळे अलीकडच्या काळात ब्रँडिंगवरही विपरीत परिणाम झाला होता. आता जीआय मानांकनामुळे मात्र याला लगाम बसणार आहे. बौद्धिक संपदा संस्थेने (इंटिलेक्चुअल प्रॉपर्टी आॅर्गनायझेशन) मुंबईत सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी देवगड, रत्नागिरीतील हापूसला जीआय मानांकन देण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी व देवगड हापूसचे वेगळेपण सांगणारे सरकारी दस्तऐवज तसेच वैज्ञानिक माहिती सादर करण्यास संस्थेने सांगितले आहे. याशिवाय इतर भागातील हापूसला जीआय देण्यात आपली अडवणूक नसावी, अशी अट संस्थेने घातली आहे. पंधरा दिवसांत ही कागदपत्रे सादर केल्यानंतर देवगड व रत्नागिरी हापूसला जीआय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (प्रतिनिधी)कोकणच्या लाल मातीची किमया!कोकणातील हापूसची सर दुसऱ्या आंब्याला येत नाही. याचे कारण इथल्या वैशिष्ट्यपूर्ण लाल मातीत आणि हवेत आहे. इथल्या मातीतील विशिष्ट खनिजांमुळे हापूसचा स्वाद जगावेगळा होतो. पण केवळ कोकणातील लाल मातीमुळे हे घडत नाही तर तिथले एकूणच पर्यावरणही कारणीभूत आहे. घाटावरच्या बऱ्याच बागायतदार शेतकऱ्यांनी कोकणातील माती नेऊन हापूसची लागवड केली. पण कोकणच्या हापूसचा गोडवा काही त्याला आला नाही. जीआय मानांकनामुळे या पर्यावरणीय वेगळेपणावर कायदेशीर शिक्कामोर्तब होणार आहे.