शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

कोकणची राखरांगोळी होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:54 AM

कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील.

राजापूर (जि. रत्नागिरी) : रिफायनरीसारखे कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेवून शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.सोमवारी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सागवे येथील कोचाळी मैदानावर नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्तांसाठी सभा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करीत असल्याची घोषणा केली. उपस्थितांनी त्याचे जोरदार स्वागत केले. देसाई यांच्या त्या घोषणेचा आधार घेवून पक्षप्रमुख ठाकरे यांनी शासनावर जोरदार टीका केली.कोकण हा निसर्गरम्य आहे. मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षडयंत्र रचले असून शिवसेना त्याला विरोध करील. मुख्यमंत्र्यांनी गुजरात अथवा नागपूर, हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा. पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसुचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरीबांधव, बागायतदार, मच्छीमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले. नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नसताना मग आताच ही मंडळीआली कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीजर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाशी सामंजस्य करार केला. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे